शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

RTI कॉपी व्हायरल, मोदींनी दत्तक घेतलेल्या 4 गावात 1 रुपयाही निधी खर्च नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 08:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांसद आदर्शग्राम योजनेत वाराणसी मंतदारसंघातील चार गावे दत्तक घेतली आहेत. मात्र, या चारपैकी एकाही गावात विकासाकामासाठी 1 रुपयांचाही खर्च करण्यात आला नाही.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांसद आदर्शग्राम योजनेत वाराणसी मंतदारसंघातील चार गावे दत्तक घेतली आहेत. मात्र, या चारपैकी एकाही गावात विकासाकामासाठी 1 रुपयांचाही खर्च करण्यात आला नाही. जिल्हा ग्रामविकास प्राधिकरणाकडून माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती देण्यात आली आहे. प्राधिकरणाचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यावरुन काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी 'विकास वेडा झाल्याचे' हेच खरे सत्य असल्याचे म्हटले आहे.

कन्नौज येथील रहिवासी अनुज वर्मा यांनी माहिती अधिकाराचा वापर करत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावांबाबत माहिती मागवली होती. वर्मा यांच्या या विनंती अर्जाला जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरणाने 30 जून रोजी पत्र पाठवून माहिती दिली. मोदींनी वाराणसीतील जयापूर, नागेपूर, ककरहिया आणि डोमरी ही चार गावे दत्तक घेतली आहेत. मात्र, या चारही गावांमध्ये गेल्या 4 वर्षात एकही रुपया खर्च करण्यात आला नाही. विशेष म्हणजे या गावात झालेला विकास हा सरकारी योजना आणि कंपनींच्या सीएसआरमधून करण्यात आला आहे. तर काही संस्थांनीही मदत करुन गावच्या विकासात हातभार लावला आहे. 

याप्रकरणी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. 'आपण दत्तक घेतलेल्या एकाही गावात खासदार निधीतून 1 रुपयाही खर्च केला नाही. आपल्या संकल्पनेतून साकारलेली सांसद आदर्शग्राम योजना हाही एक जुमलाच' असल्याचे सुरजेवाला यांनी मोदींनी उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही ट्विट करुन मोदींवर हल्लाबोल केला. मोदी सरकार आरटीआयला विरोध का करते, हे आम्हाला चांगलच माहित आहे. पंतप्रधान मोदींबाबतचे काही वास्तव यातून बाहेर निघते, जसे की स्वत:च्या प्रचारासाठी 400 कोटींचा खर्च करणे. पण, वाराणसीत दत्तक घेतलेल्या गावांसाठी एक रुपयाही न खर्च करणे, अशा शब्दात चतुर्वेदी यांनी मोदींना ट्विट केले आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता