शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'3 मुलं जन्माला घाला...', मोहन भागवतांच्या वक्तव्यावर विरोधकांनी उपस्थित केले प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 18:51 IST

सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या वाढीचा दर घसरल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

RSS Mohan Bhagwat Statement : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या वाढीचा दर (प्रजनन दर) घसरल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, 'जेव्हा एखाद्या समाजाचा लोकसंख्या वाढीचा दर 2.1 च्या खाली जातो, तेव्हा तो समाज नष्ट होण्याच्या मार्गावर असतो. अशा कितीतरी भाषा आणि समाज नष्ट झाला आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येकाने 3 मुलांना जन्म दिला पाहिजे.' दरम्यान, भागवतांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीका सुरू केल्या आहेत.

सपा प्रवक्त्याची टीकासमाजवादी पक्षाचे प्रवक्ते फखरुल हसन चंद म्हणाले की, 'मोहन भागवतांची वक्तव्ये भाजपला अस्वस्थ करणारी असतात. गेल्या वेळीही मोहन भागवत म्हणाले होते की, प्रत्येक मशिदीत मंदिर शोधणे बंद करावे. मंदिर-मशिदीचे राजकारण करणाऱ्यांकडे तेव्हा उत्तर नव्हते. आता मोहन भागवत देशाच्या लोकसंख्येवर बोलत आहेत. आताही भाजपकडे उत्तर नाही. सपाची विचारधारा आरएसएसशी जुळणारी नाही, पण त्यांनी काही बरोबर म्हटले असेल, तर त्याला बरोबर म्हणणे चुकीचे नाही.'

काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न काँग्रेस नेते उमंग सिंघार यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मोहन भागवत यांना सवाल करत ते म्हणाले, 'जे आधी आहेत, त्यांना नोकऱ्या द्या. नोकऱ्या नाहीत, शेतकऱ्यांना योग्य भाव नाही अन् मोहन भागवत जास्त मुले जन्माला घालण्याची वक्तव्ये करत आहेत. देशात बेरोजगारी आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत. चीनची लोकसंख्या कमी असताना आज तो महासत्ता बनला आहे. मोहन भागवत यांना चीनकडून शिकता येत नाही आणि त्यांना लोकसंख्येच्या बाबतीत देश शक्तिशाली बनवायचा आहे.' 

ओवेसींची टीकाऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'मोहन भागवत म्हणतात की, लोकसंख्या वाढली पाहिजे, पण मुलांना काही फायदा मिळेल, याची खात्री ते करतील का? गरीब कुटुंबांना दरमहा 1500 रुपये देणार का? भागवतांनी आपल्या समाजातील उदाहरणे आधी दाखवावीत.'

मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?विज्ञान मानते की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 च्या खाली गेला तर तो समाज आपोआपच संपुष्टात येतो. या कारणामुळे अनेक भाषा आणि समाज संपुष्टात आले. भारताचे लोकसंख्या धोरण सन 2000 च्या सुमारास ठरविण्यात आले होते, ज्यामध्ये देशाचा लोकसंख्या वाढीचा दर 2.1 असावा असे स्पष्ट करण्यात आले होते. मानवी जन्मदर 1 वर ठेवता येत नाही, त्यामुळे किमान 2 किंवा 3 मुले जन्माला आली पाहिजेत. देशाच्या भविष्यासाठी योग्य लोकसंख्या वाढीचा दर राखणे महत्त्वाचे आहे. संख्या खूप महत्त्वाची आहे कारण समाज टिकला पाहिजे, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले आहे.

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcongressकाँग्रेसAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी