शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
2
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
3
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
4
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
5
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
6
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
7
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
8
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
9
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
10
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
11
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
12
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
13
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
14
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
15
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
16
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
17
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
18
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
19
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?

'3 मुलं जन्माला घाला...', मोहन भागवतांच्या वक्तव्यावर विरोधकांनी उपस्थित केले प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 18:51 IST

सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या वाढीचा दर घसरल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

RSS Mohan Bhagwat Statement : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या वाढीचा दर (प्रजनन दर) घसरल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, 'जेव्हा एखाद्या समाजाचा लोकसंख्या वाढीचा दर 2.1 च्या खाली जातो, तेव्हा तो समाज नष्ट होण्याच्या मार्गावर असतो. अशा कितीतरी भाषा आणि समाज नष्ट झाला आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येकाने 3 मुलांना जन्म दिला पाहिजे.' दरम्यान, भागवतांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीका सुरू केल्या आहेत.

सपा प्रवक्त्याची टीकासमाजवादी पक्षाचे प्रवक्ते फखरुल हसन चंद म्हणाले की, 'मोहन भागवतांची वक्तव्ये भाजपला अस्वस्थ करणारी असतात. गेल्या वेळीही मोहन भागवत म्हणाले होते की, प्रत्येक मशिदीत मंदिर शोधणे बंद करावे. मंदिर-मशिदीचे राजकारण करणाऱ्यांकडे तेव्हा उत्तर नव्हते. आता मोहन भागवत देशाच्या लोकसंख्येवर बोलत आहेत. आताही भाजपकडे उत्तर नाही. सपाची विचारधारा आरएसएसशी जुळणारी नाही, पण त्यांनी काही बरोबर म्हटले असेल, तर त्याला बरोबर म्हणणे चुकीचे नाही.'

काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न काँग्रेस नेते उमंग सिंघार यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मोहन भागवत यांना सवाल करत ते म्हणाले, 'जे आधी आहेत, त्यांना नोकऱ्या द्या. नोकऱ्या नाहीत, शेतकऱ्यांना योग्य भाव नाही अन् मोहन भागवत जास्त मुले जन्माला घालण्याची वक्तव्ये करत आहेत. देशात बेरोजगारी आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत. चीनची लोकसंख्या कमी असताना आज तो महासत्ता बनला आहे. मोहन भागवत यांना चीनकडून शिकता येत नाही आणि त्यांना लोकसंख्येच्या बाबतीत देश शक्तिशाली बनवायचा आहे.' 

ओवेसींची टीकाऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'मोहन भागवत म्हणतात की, लोकसंख्या वाढली पाहिजे, पण मुलांना काही फायदा मिळेल, याची खात्री ते करतील का? गरीब कुटुंबांना दरमहा 1500 रुपये देणार का? भागवतांनी आपल्या समाजातील उदाहरणे आधी दाखवावीत.'

मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?विज्ञान मानते की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 च्या खाली गेला तर तो समाज आपोआपच संपुष्टात येतो. या कारणामुळे अनेक भाषा आणि समाज संपुष्टात आले. भारताचे लोकसंख्या धोरण सन 2000 च्या सुमारास ठरविण्यात आले होते, ज्यामध्ये देशाचा लोकसंख्या वाढीचा दर 2.1 असावा असे स्पष्ट करण्यात आले होते. मानवी जन्मदर 1 वर ठेवता येत नाही, त्यामुळे किमान 2 किंवा 3 मुले जन्माला आली पाहिजेत. देशाच्या भविष्यासाठी योग्य लोकसंख्या वाढीचा दर राखणे महत्त्वाचे आहे. संख्या खूप महत्त्वाची आहे कारण समाज टिकला पाहिजे, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले आहे.

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcongressकाँग्रेसAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी