शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

'3 मुलं जन्माला घाला...', मोहन भागवतांच्या वक्तव्यावर विरोधकांनी उपस्थित केले प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 18:51 IST

सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या वाढीचा दर घसरल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

RSS Mohan Bhagwat Statement : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या वाढीचा दर (प्रजनन दर) घसरल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, 'जेव्हा एखाद्या समाजाचा लोकसंख्या वाढीचा दर 2.1 च्या खाली जातो, तेव्हा तो समाज नष्ट होण्याच्या मार्गावर असतो. अशा कितीतरी भाषा आणि समाज नष्ट झाला आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येकाने 3 मुलांना जन्म दिला पाहिजे.' दरम्यान, भागवतांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीका सुरू केल्या आहेत.

सपा प्रवक्त्याची टीकासमाजवादी पक्षाचे प्रवक्ते फखरुल हसन चंद म्हणाले की, 'मोहन भागवतांची वक्तव्ये भाजपला अस्वस्थ करणारी असतात. गेल्या वेळीही मोहन भागवत म्हणाले होते की, प्रत्येक मशिदीत मंदिर शोधणे बंद करावे. मंदिर-मशिदीचे राजकारण करणाऱ्यांकडे तेव्हा उत्तर नव्हते. आता मोहन भागवत देशाच्या लोकसंख्येवर बोलत आहेत. आताही भाजपकडे उत्तर नाही. सपाची विचारधारा आरएसएसशी जुळणारी नाही, पण त्यांनी काही बरोबर म्हटले असेल, तर त्याला बरोबर म्हणणे चुकीचे नाही.'

काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न काँग्रेस नेते उमंग सिंघार यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मोहन भागवत यांना सवाल करत ते म्हणाले, 'जे आधी आहेत, त्यांना नोकऱ्या द्या. नोकऱ्या नाहीत, शेतकऱ्यांना योग्य भाव नाही अन् मोहन भागवत जास्त मुले जन्माला घालण्याची वक्तव्ये करत आहेत. देशात बेरोजगारी आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत. चीनची लोकसंख्या कमी असताना आज तो महासत्ता बनला आहे. मोहन भागवत यांना चीनकडून शिकता येत नाही आणि त्यांना लोकसंख्येच्या बाबतीत देश शक्तिशाली बनवायचा आहे.' 

ओवेसींची टीकाऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'मोहन भागवत म्हणतात की, लोकसंख्या वाढली पाहिजे, पण मुलांना काही फायदा मिळेल, याची खात्री ते करतील का? गरीब कुटुंबांना दरमहा 1500 रुपये देणार का? भागवतांनी आपल्या समाजातील उदाहरणे आधी दाखवावीत.'

मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?विज्ञान मानते की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 च्या खाली गेला तर तो समाज आपोआपच संपुष्टात येतो. या कारणामुळे अनेक भाषा आणि समाज संपुष्टात आले. भारताचे लोकसंख्या धोरण सन 2000 च्या सुमारास ठरविण्यात आले होते, ज्यामध्ये देशाचा लोकसंख्या वाढीचा दर 2.1 असावा असे स्पष्ट करण्यात आले होते. मानवी जन्मदर 1 वर ठेवता येत नाही, त्यामुळे किमान 2 किंवा 3 मुले जन्माला आली पाहिजेत. देशाच्या भविष्यासाठी योग्य लोकसंख्या वाढीचा दर राखणे महत्त्वाचे आहे. संख्या खूप महत्त्वाची आहे कारण समाज टिकला पाहिजे, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले आहे.

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcongressकाँग्रेसAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी