शहरं
Join us  
Trending Stories
1
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
4
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
5
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
6
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
7
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
8
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
9
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
10
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
11
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
12
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
13
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
14
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
15
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
16
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
17
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
18
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
19
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
20
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 

“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 16:10 IST

“जे लोक स्वतःला हिंदू मानत नाहीत, तेदेखील हिंदूच आहेत.”

RSS Mohan Bhagwat:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज मध्य प्रदेशातील सतना येथे मेहेर शाह दरबाराच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना संघप्रमुखांनी एकतेवर भर दिला. ते म्हणाले की, “आपण सर्व हिंदू आहोत. ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली. धर्म किंवा भाषा काहीही असो, आपण सर्व एकच आहोत.” 

मोहन भागवत पुढे म्हणाले, “आज आपण स्वतःला वेगळे समजतो, पण वास्तव हे आहे की, आपण सर्व एकच आहोत. आपण कोणत्याही धर्म, भाषेचे किंवा प्रदेशाचे असलो तरी आपण हिंदू आहोत. आपल्यामध्ये फूट पाडणारे इंग्रज होते. आपण स्वतःकडे आध्यात्मिक आरशातून पाहिल्यास आपण एकच आहोत, हे जाणवेल. अहंकार सोडून आत्मपरीक्षण केल्यासच समाजात परिवर्तन येईल. खरे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारताचे आध्यात्मिक ज्ञान दैनंदिन जीवनात लागू केले पाहिजे. भारत जगाला शांती आणि समृद्धीचा संदेश देतो.” 

‘अविभाजित भारत’चा संदर्भ आणि हक्क परत मिळवण्याचा उल्लेख करत भागवत म्हणाले, “जे लोक स्वतःला हिंदू मानत नाहीत, ते परदेशात जातात, तेव्हा संपूर्ण जग त्यांना हिंदू मानते. त्यांनी कितीही नाकरले तरी, सत्य हेच आहे की, ते हिंदू आहेत. भारताचे विभाजन झाले, तेव्हा येथील अनेक सिंधी पाकिस्तानात गेले नाहीत. नवीन पिढीने याचा विचार केला पाहिजे. ते आपले दुसरे घर आहे. इतरांनी आपले सामान आणि जागा घेतली, परंतु एक दिवस आपण आपला हक्क परत मिळवू.”

नागपूरातून एकतेचा संदेश आरएसएस प्रमुखांनी नागपुरातही एकतेचा संदेश दिला. विजयादशमीच्या दिवशी आयोजित कार्यक्रमात संघप्रमुख म्हणाले होते की, “भारताची खरी ओळख पुन्हा निर्माण करण्याची वेळ आली आहे. दीर्घकाळ चाललेल्या परकीय आक्रमणांनी आपली स्वदेशी व्यवस्था नष्ट केली. आता काळानुरुप समाजात आणि शिक्षण व्यवस्थेत पुन्हा स्थापित करण्याची आवश्यकता आहे. आपण अशा व्यक्ती तयार केल्या पाहिजेत, जे हे कार्य पूर्ण करू शकतील. यासाठी केवळ मानसिक संमतीची आवश्यकता नाही, तर मन, वाणी आणि कृतीचे परिवर्तन देखील आवश्यक आहे. हे परिवर्तन एका व्यवस्थेशिवाय अशक्य आहे आणि संघाची शाखा ही एकमेव मजबूत व्यवस्था आहे, जी हे काम करत आहे.”

रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...

English
हिंदी सारांश
Web Title : Bhagwat: Religion, language irrelevant, we are all Hindu; British divided us.

Web Summary : Mohan Bhagwat emphasized unity, stating everyone is Hindu regardless of religion or language, blaming British for divisions. He urged spiritual reflection, reclaiming undivided India, and promoting India's spiritual knowledge for global peace and prosperity.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHinduहिंदूMadhya Pradeshमध्य प्रदेश