शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

'भारतीय लष्कर कोणत्याही क्षणी लाहोरमध्ये घुसू शकतं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 17:45 IST

'भाजपा जम्मू-काश्मीरमध्ये सत्ते असताना 300 दहशतवाद्यांचा खात्मा'

नागपूर: भारतीय लष्कर कोणत्याही क्षणी लाहोरमध्ये घुसू शकतं, हा संदेश सर्जिकल स्ट्राईकनं पाकिस्तानला दिला, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी म्हटलं. देशाची सद्यस्थिती या विषयावर आधारित व्याख्यान मालिकेत कुमार बोलत होते. जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपाचं सरकार असताना 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, असंही इंद्रेश कुमार म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया रोखण्यात भाजपा सरकारनं महत्त्वाची भूमिका बजावली, असं कुमार नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान मालिकेत म्हणाले. 'जम्मू-काश्मीरमधील सरकारमध्ये असताना आम्ही 3-4 महत्त्वपूर्ण कामं केली. जेव्हा ही कामं पूर्णत्वास गेली, तेव्हा आम्ही सरकारमधून बाहेर पडलो. आम्ही सत्तेचा त्याग केला,' असं त्यांनी सांगितलं. 'जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत असताना आम्ही दहशतवाद्यांविरोधात अभियान राबवलं. यामध्ये 250 ते 300 दहशतवादी मारले गेले. पोलीस, लष्कर, एनआयए आणि गुप्तचर विभागाच्या मदतीनं दहशतवाद्यांविरोधात धडक कारवाया करण्यात आल्या,' असं इंद्रेश कुमार यांनी म्हटलं. भारतीय लष्करानं केलेला सर्जिकल स्ट्राईक जम्मू-काश्मीरमधील सरकारच्या सहकार्याशिवाय शक्य नव्हता, असं कुमार म्हणाले. मात्र जम्मू-काश्मीरमधील सरकारबद्दल बोलताना त्यांनी पीडीपीचा उल्लेख टाळला. 'आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला. भारतीय सैन्य कोणत्याही क्षणी लाहोरपर्यंत मुसंडी मारु शकतो, हा संदेश यातून पाकिस्तानला मिळाला,' असं इंद्रेश कुमार यांनी म्हटलं. 

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Armyभारतीय जवानRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान