शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

'भारतीय लष्कर कोणत्याही क्षणी लाहोरमध्ये घुसू शकतं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 17:45 IST

'भाजपा जम्मू-काश्मीरमध्ये सत्ते असताना 300 दहशतवाद्यांचा खात्मा'

नागपूर: भारतीय लष्कर कोणत्याही क्षणी लाहोरमध्ये घुसू शकतं, हा संदेश सर्जिकल स्ट्राईकनं पाकिस्तानला दिला, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी म्हटलं. देशाची सद्यस्थिती या विषयावर आधारित व्याख्यान मालिकेत कुमार बोलत होते. जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपाचं सरकार असताना 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, असंही इंद्रेश कुमार म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया रोखण्यात भाजपा सरकारनं महत्त्वाची भूमिका बजावली, असं कुमार नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान मालिकेत म्हणाले. 'जम्मू-काश्मीरमधील सरकारमध्ये असताना आम्ही 3-4 महत्त्वपूर्ण कामं केली. जेव्हा ही कामं पूर्णत्वास गेली, तेव्हा आम्ही सरकारमधून बाहेर पडलो. आम्ही सत्तेचा त्याग केला,' असं त्यांनी सांगितलं. 'जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत असताना आम्ही दहशतवाद्यांविरोधात अभियान राबवलं. यामध्ये 250 ते 300 दहशतवादी मारले गेले. पोलीस, लष्कर, एनआयए आणि गुप्तचर विभागाच्या मदतीनं दहशतवाद्यांविरोधात धडक कारवाया करण्यात आल्या,' असं इंद्रेश कुमार यांनी म्हटलं. भारतीय लष्करानं केलेला सर्जिकल स्ट्राईक जम्मू-काश्मीरमधील सरकारच्या सहकार्याशिवाय शक्य नव्हता, असं कुमार म्हणाले. मात्र जम्मू-काश्मीरमधील सरकारबद्दल बोलताना त्यांनी पीडीपीचा उल्लेख टाळला. 'आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला. भारतीय सैन्य कोणत्याही क्षणी लाहोरपर्यंत मुसंडी मारु शकतो, हा संदेश यातून पाकिस्तानला मिळाला,' असं इंद्रेश कुमार यांनी म्हटलं. 

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Armyभारतीय जवानRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान