शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

'भारतीय लष्कर कोणत्याही क्षणी लाहोरमध्ये घुसू शकतं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 17:45 IST

'भाजपा जम्मू-काश्मीरमध्ये सत्ते असताना 300 दहशतवाद्यांचा खात्मा'

नागपूर: भारतीय लष्कर कोणत्याही क्षणी लाहोरमध्ये घुसू शकतं, हा संदेश सर्जिकल स्ट्राईकनं पाकिस्तानला दिला, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी म्हटलं. देशाची सद्यस्थिती या विषयावर आधारित व्याख्यान मालिकेत कुमार बोलत होते. जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपाचं सरकार असताना 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, असंही इंद्रेश कुमार म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया रोखण्यात भाजपा सरकारनं महत्त्वाची भूमिका बजावली, असं कुमार नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान मालिकेत म्हणाले. 'जम्मू-काश्मीरमधील सरकारमध्ये असताना आम्ही 3-4 महत्त्वपूर्ण कामं केली. जेव्हा ही कामं पूर्णत्वास गेली, तेव्हा आम्ही सरकारमधून बाहेर पडलो. आम्ही सत्तेचा त्याग केला,' असं त्यांनी सांगितलं. 'जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत असताना आम्ही दहशतवाद्यांविरोधात अभियान राबवलं. यामध्ये 250 ते 300 दहशतवादी मारले गेले. पोलीस, लष्कर, एनआयए आणि गुप्तचर विभागाच्या मदतीनं दहशतवाद्यांविरोधात धडक कारवाया करण्यात आल्या,' असं इंद्रेश कुमार यांनी म्हटलं. भारतीय लष्करानं केलेला सर्जिकल स्ट्राईक जम्मू-काश्मीरमधील सरकारच्या सहकार्याशिवाय शक्य नव्हता, असं कुमार म्हणाले. मात्र जम्मू-काश्मीरमधील सरकारबद्दल बोलताना त्यांनी पीडीपीचा उल्लेख टाळला. 'आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला. भारतीय सैन्य कोणत्याही क्षणी लाहोरपर्यंत मुसंडी मारु शकतो, हा संदेश यातून पाकिस्तानला मिळाला,' असं इंद्रेश कुमार यांनी म्हटलं. 

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Armyभारतीय जवानRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान