शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

बापूंच्या चुकीमुळे झाली देशाची फाळणी, नेहरू-जिनांना ADC बनवून चूक केली - RSS नेते इंद्रेश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 20:28 IST

इंद्रेश कुमारांनी अशा प्रकारचे भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही अशा प्रकारची वक्यव्य केली आहेत.

राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे (RSS) नेते इंद्रेश कुमार यांनी महात्मा गांधी यांच्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. 75 वर्षांपूर्वी भारताला फाळणीच्या रूपात स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी इंग्रजांसोबत चर्चा करण्यासाठी बापूंनी जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना यांची आपले एडीसी म्हणून निवड केली नसती, तर भारताचे तुकडे झाले नसते. एवढेच नाही, तर त्यावेळी बापूंनी सरदार पटेल, सुभाष चंद्र बोस अथवा महर्षी अरविंद यांची एडीसी म्हणून निवड केली असती, तर भारताची फाळणी झाली नसती. बापूंच्या एका छोट्याशा चुकीने देशाची फाळणी केली, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. ते राजस्थानातील जयपूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते. 

इंद्रेश कुमारांनी अशा प्रकारचे भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही अशा प्रकारची वक्यव्य केली आहेत. नुकतेच संघाच्या मुख्यालयावर तिरंगा ध्वज न फडकावण्यासंदर्भात काँग्रेसने संघावर निशाणा साधला होता. यावर इंद्रेश कुमार यांनी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींसह इतर काही नेत्यांवर निशाणा साधला होता. आरएसएसला शिव्या देणे, ही लोक फॅशन समजतात, त्यांनी या फॅशनपासून मुक्त व्यायला हवे. हीच इश्वराकडे प्रार्थना, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले होते.

राष्ट्रपतींचा अपमान करण्यात आला - काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लोकसभेत ‘राष्ट्रपत्नी’ म्हणून संबोधित केले होते. यामुळे मोठा गदारोळ झाला होता. यावरूनही इंद्रेश कुमार यांनी निशाना साधला आहे. ते म्हणाले, काही लोकांनी भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केला. त्यांना राष्ट्रपतींचा अपमान करतानाही काही वाटत नाही. अशा प्रकारचे हे लोक आहे.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMahatma Gandhiमहात्मा गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू