शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

“पाकिस्तान काश्मीरशिवाय पूर्ण होत नसेल तर भारत लाहोर आणि कराचीविना अपूर्ण”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 09:56 IST

पंतप्रधान मोदींनी राजकारणामुळे संपुष्टात चाललेल्या माणुसकीला नवसंजीवनी देण्याचे काम केले आहे, असे कौतुकोद्गार काढण्यात आले आहेत.

नवी दिल्ली:पाकिस्तानकडूनजम्मू-काश्मीर प्रश्नी काही ना काही कुरापती सुरूच असतात. जम्मू-काश्मीरचा मुद्दा उकरून काढण्याची एकही संधी पाकिस्तान सोडत नाही. यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले आहे. पाकिस्तानवाले जर म्हणत असतील की, जम्मू-काश्मीरशिवाय पाकिस्तान अपूर्ण आहे. तर, आता आम्ही सांगतो की, कराची आणि लाहौरविना भारत अपूर्ण आहे. 

भाजप कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना इंद्रेश कुमार यांनी चीन आणि पाकिस्तानच्या भारतविरोधी धोरणावर टीका करत निषेध केला. तसेच चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा, याचा पुनरुच्चारही इंद्रेश कुमार यांनी केला. तसेच भारतातील दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राजकारणामुळे संपुष्टात चाललेल्या माणुसकीला नवसंजीवनी देण्याचे काम केले आहे, असेही इंद्रेश कुमार यांनी यावेळी नमूद केले. 

तर मग भारत लाहोर-कराचीशिवाय अपूर्ण 

पाकिस्तान जर म्हणत असेल की काश्मीरशिवाय तो अपूर्ण आहे. तर मग लाहोर आणि कराचीशिवाय भारत अपूर्ण आहे, असे आता म्हणायला हवे, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी दिलेला दिव्यांग हा शब्द जगभरात वापरात यायला हवा, अशी आशाही इंद्रेश कुमार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. 

दरम्यान, यापूर्वी वाराणसी येथे बोलताना, मोहम्मद अली जिना ज्यांना महापुरुष वाटतात, त्यांनी तातडीने देश सोडावा. भारत आणि भारतीयांवर ओझे होऊन उगाचच येथे राहू नये. जिनाप्रेमी लोकांनी तत्काळ भारत सोडला तरी चालेल, अशी टीका इंद्रेश कुमार यांनी केली होती. दुसऱ्यांना चुकीचे सिद्ध करण्यासाठी निराधार आरोप करणे किंवा दावे करणे चुकीचे आहे, असेही इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. अखिलेश यादव यांनी एका सभेत मोहम्मद अली जिना यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे वाद झाला होता. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान