शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

“देशाला अब्दुल कलामांसारख्या देशभक्तांची गरज, जिनांसारखे देशद्रोही नकोत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 10:44 IST

जिना आणि मुस्लीम लीगने आपल्या मातृभूमीचे तुकडे केले. अशी विचारसणी असणाऱ्यांवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात यावा, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते अनेक मुद्द्यांवर रोखठोक मते व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. या वक्तव्यांनंतर संघासह भाजपवर विरोधकांची जोरदार टीका होताना पाहायला मिळत आहे. यातच RSS चे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी पुन्हा एकदा एक मोठे विधान केले आहे. देशाला अब्दुल कलाम यांच्यासारख्या देशभक्तांची गरज आहे. मोहम्मद अली जिनांसारख्या देशद्रोह्यांची गरज नाही. मोहम्मद अली जिनांप्रमाणे विचारसणी असणाऱ्यांवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात यावा, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. 

विशाल भारत संस्थान तसेच मुस्लीम महिला फेडरेशन आणि मुस्लीम राष्ट्रीय मंचाने संयुक्तरित्या आयोजित एका कार्यक्रमात बोलताना इंद्रेश कुमार पुढे म्हणाले की, देशाला एकत्र आणणारी कलामांसारखी व्यक्ती सध्या हवीय. जिनांसारखा द्रेशद्रोही देशाला नकोय. हा देश बहादुर शाह जफार, अशरफुल्लाह खान, बेगम हजरत महाल यासारख्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचा हा देश आहे, असे त्यांनी नमूद केले. 

जिनांसारखे देशद्रोही नकोत

भारत देश कलमांसारख्या शास्त्रज्ञांचा आहे. जिनांसारख्या लोकांची आणि तशी विचारसरणी असणाऱ्यांची देशाला गरज नाही. अशा व्यक्तींवर पूर्णपणे बहिष्कार घातला पाहिजे. जिना आणि मुस्लीम लीगने आपल्या मातृभूमीचे तुकडे केले. त्यांच्यामुळे आपण एकमेकांशी लढतोय. अशा लोकांना चांगले आणि देशभक्त म्हणणे पाप आहे, असेही इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. 

चीनला धडा शिकवणाऱ्यांना आपण पाठिंबा द्यायला हवा

चीन मुद्द्यावर बोलताना इंद्रेश कुमार म्हणाले की, चीनला धडा शिकवणाऱ्यांना आपण पाठिंबा देणे गरजचे आहे. पाकिस्तानच्या हेकेखोरीपासून आपल्याला वाचवणाऱ्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातील मुस्लीमांच्या एका हातामध्ये कुराण आणि दुसऱ्या हातात कंप्युटर देण्यासंदर्भातील भूमिका पूर्वीच स्पष्ट केली, असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीची सत्ता होती तेव्हा तेथे वरचेवर दंगली व्हायच्या. दिवसाढवळ्या समाजकंटकांकडून महिलांची छेड काढली जायची. तेव्हा त्यांना मदत करणारेही कोणी नव्हते. आता आपल्याकडे एक सशक्त सरकार आहे. आता राज्यात दंगली होत नाहीत, असे सांगत इंद्रेश कुमार यांनी योगी सरकारचे कौतुक केले.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAPJ Abdul Kalamएपीजे अब्दुल कलामBJPभाजपा