शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

“देशाला अब्दुल कलामांसारख्या देशभक्तांची गरज, जिनांसारखे देशद्रोही नकोत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 10:44 IST

जिना आणि मुस्लीम लीगने आपल्या मातृभूमीचे तुकडे केले. अशी विचारसणी असणाऱ्यांवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात यावा, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते अनेक मुद्द्यांवर रोखठोक मते व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. या वक्तव्यांनंतर संघासह भाजपवर विरोधकांची जोरदार टीका होताना पाहायला मिळत आहे. यातच RSS चे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी पुन्हा एकदा एक मोठे विधान केले आहे. देशाला अब्दुल कलाम यांच्यासारख्या देशभक्तांची गरज आहे. मोहम्मद अली जिनांसारख्या देशद्रोह्यांची गरज नाही. मोहम्मद अली जिनांप्रमाणे विचारसणी असणाऱ्यांवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात यावा, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. 

विशाल भारत संस्थान तसेच मुस्लीम महिला फेडरेशन आणि मुस्लीम राष्ट्रीय मंचाने संयुक्तरित्या आयोजित एका कार्यक्रमात बोलताना इंद्रेश कुमार पुढे म्हणाले की, देशाला एकत्र आणणारी कलामांसारखी व्यक्ती सध्या हवीय. जिनांसारखा द्रेशद्रोही देशाला नकोय. हा देश बहादुर शाह जफार, अशरफुल्लाह खान, बेगम हजरत महाल यासारख्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचा हा देश आहे, असे त्यांनी नमूद केले. 

जिनांसारखे देशद्रोही नकोत

भारत देश कलमांसारख्या शास्त्रज्ञांचा आहे. जिनांसारख्या लोकांची आणि तशी विचारसरणी असणाऱ्यांची देशाला गरज नाही. अशा व्यक्तींवर पूर्णपणे बहिष्कार घातला पाहिजे. जिना आणि मुस्लीम लीगने आपल्या मातृभूमीचे तुकडे केले. त्यांच्यामुळे आपण एकमेकांशी लढतोय. अशा लोकांना चांगले आणि देशभक्त म्हणणे पाप आहे, असेही इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. 

चीनला धडा शिकवणाऱ्यांना आपण पाठिंबा द्यायला हवा

चीन मुद्द्यावर बोलताना इंद्रेश कुमार म्हणाले की, चीनला धडा शिकवणाऱ्यांना आपण पाठिंबा देणे गरजचे आहे. पाकिस्तानच्या हेकेखोरीपासून आपल्याला वाचवणाऱ्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातील मुस्लीमांच्या एका हातामध्ये कुराण आणि दुसऱ्या हातात कंप्युटर देण्यासंदर्भातील भूमिका पूर्वीच स्पष्ट केली, असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीची सत्ता होती तेव्हा तेथे वरचेवर दंगली व्हायच्या. दिवसाढवळ्या समाजकंटकांकडून महिलांची छेड काढली जायची. तेव्हा त्यांना मदत करणारेही कोणी नव्हते. आता आपल्याकडे एक सशक्त सरकार आहे. आता राज्यात दंगली होत नाहीत, असे सांगत इंद्रेश कुमार यांनी योगी सरकारचे कौतुक केले.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAPJ Abdul Kalamएपीजे अब्दुल कलामBJPभाजपा