शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

“देशाला अब्दुल कलामांसारख्या देशभक्तांची गरज, जिनांसारखे देशद्रोही नकोत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 10:44 IST

जिना आणि मुस्लीम लीगने आपल्या मातृभूमीचे तुकडे केले. अशी विचारसणी असणाऱ्यांवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात यावा, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते अनेक मुद्द्यांवर रोखठोक मते व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. या वक्तव्यांनंतर संघासह भाजपवर विरोधकांची जोरदार टीका होताना पाहायला मिळत आहे. यातच RSS चे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी पुन्हा एकदा एक मोठे विधान केले आहे. देशाला अब्दुल कलाम यांच्यासारख्या देशभक्तांची गरज आहे. मोहम्मद अली जिनांसारख्या देशद्रोह्यांची गरज नाही. मोहम्मद अली जिनांप्रमाणे विचारसणी असणाऱ्यांवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात यावा, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. 

विशाल भारत संस्थान तसेच मुस्लीम महिला फेडरेशन आणि मुस्लीम राष्ट्रीय मंचाने संयुक्तरित्या आयोजित एका कार्यक्रमात बोलताना इंद्रेश कुमार पुढे म्हणाले की, देशाला एकत्र आणणारी कलामांसारखी व्यक्ती सध्या हवीय. जिनांसारखा द्रेशद्रोही देशाला नकोय. हा देश बहादुर शाह जफार, अशरफुल्लाह खान, बेगम हजरत महाल यासारख्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचा हा देश आहे, असे त्यांनी नमूद केले. 

जिनांसारखे देशद्रोही नकोत

भारत देश कलमांसारख्या शास्त्रज्ञांचा आहे. जिनांसारख्या लोकांची आणि तशी विचारसरणी असणाऱ्यांची देशाला गरज नाही. अशा व्यक्तींवर पूर्णपणे बहिष्कार घातला पाहिजे. जिना आणि मुस्लीम लीगने आपल्या मातृभूमीचे तुकडे केले. त्यांच्यामुळे आपण एकमेकांशी लढतोय. अशा लोकांना चांगले आणि देशभक्त म्हणणे पाप आहे, असेही इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. 

चीनला धडा शिकवणाऱ्यांना आपण पाठिंबा द्यायला हवा

चीन मुद्द्यावर बोलताना इंद्रेश कुमार म्हणाले की, चीनला धडा शिकवणाऱ्यांना आपण पाठिंबा देणे गरजचे आहे. पाकिस्तानच्या हेकेखोरीपासून आपल्याला वाचवणाऱ्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातील मुस्लीमांच्या एका हातामध्ये कुराण आणि दुसऱ्या हातात कंप्युटर देण्यासंदर्भातील भूमिका पूर्वीच स्पष्ट केली, असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीची सत्ता होती तेव्हा तेथे वरचेवर दंगली व्हायच्या. दिवसाढवळ्या समाजकंटकांकडून महिलांची छेड काढली जायची. तेव्हा त्यांना मदत करणारेही कोणी नव्हते. आता आपल्याकडे एक सशक्त सरकार आहे. आता राज्यात दंगली होत नाहीत, असे सांगत इंद्रेश कुमार यांनी योगी सरकारचे कौतुक केले.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAPJ Abdul Kalamएपीजे अब्दुल कलामBJPभाजपा