शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाच्या प्रस्तावनेतून ''धर्मनिरपेक्ष'' शब्द हटवण्यात यावा, आरएसएसच्या नेत्याची मागणी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 09:49 IST

धर्मनिरपेक्षता ही पाश्चात्य कल्पना आहे. ती पश्चिमेकडून आली आहे. वास्तविकदृष्ट्या ती पोपच्या वर्चस्वाच्या विरुद्ध आहे. भारताला धर्मनिरपेक्षतेची गरज नाही.

नवी दिल्ली - भारतीय राज्यघटनेमधील काही तरतुदींबाबतच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवर विरोधकांकडून नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असते. दरम्यान, संघाच्या एका वरिष्ठ नेत्याने घटनेतील धर्मनिरपेक्ष शब्दाबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य नेत्यांपैकी एक असलेले आणि प्रजन प्रवाहचे राष्ट्रीय संयोजन नंदकुमार यांनी राज्यघटनेमध्ये समाविष्ट असलेल्या धर्मनिरपेक्ष या शब्दाचा पुनर्विचार व्हावा, असे मत मांडले आहे. धर्मनिरपेक्ष हा शब्द पाश्चात्य कल्पना आहे, असा दावाही त्यांनी केला. देशाच्या राज्यघटनेमध्ये भारत हा एक लोकशाही संघराज्य, स्वायत्त, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष देश असेल, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. मात्र यातील धर्मनिरपेक्ष या शब्दाबाबत नंदकुमार यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. नंदकुमार म्हणाले की, ''धर्मनिरपेक्षता ही पाश्चात्य कल्पना आहे. ती पश्चिमेकडून आली आहे. वास्तविकदृष्ट्या ती पोपच्या वर्चस्वाच्या विरुद्ध आहे. भारताला धर्मनिरपेक्षतेची गरज नाही.''

नंदकुमार यांनी गुरुवारी ''बदलते दौर मे हिंदुत्व'' नावाच्या पुस्तकाचेही प्रकाशन झाले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कृष्ण गोपाल यांनीह सहभाग घेतला होता. नंदकुमार यांनी ''पश्चिम बंगालचे इस्लामीकरण'' या आपल्या पुस्तकामधून त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. ''आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत याची ग्वाही देणारी पाटी लावण्याची गरज आहे का? की आपला व्यवहार, कार्य आणि भूमिकेच्या माध्यमातून आपण ते सिद्ध केले पाहिजे? याचा विचार व्हायला हवा,'' असे नंदकुमार यांनी सांगितले. ''घटनेच्या प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्ष शब्दाला स्थान असणे गरजेचे नाही. तसेच संविधानाचे निर्मातेसुद्धा या शब्दाच्या विरोधात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कृष्णस्वामी अय्यर यांच्यासह सर्वांनी या शब्दाबाबत चर्चा केली होती. तसेच घटनेच्या प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द असू नये असे मत मांडले होते. तरीही त्यावेळी या शब्दाची मागणी करण्यात आली, चर्चा करण्यात आली, तसेच घटनेत हा शब्द समाविष्ट करू नये, असा निर्णयही घेण्यात आला होता.''असे नंदकुमार म्हणाले. 
मात्र 1976 मध्ये इंदिरा गांधी यांनी घटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष शब्द समाविष्ट करण्यासाठी भर दिला. तेव्हा त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे याबाबतचे मत नाकारण्यात आले, असा दावाही त्यांनी केला. मात्र लोकसभेत 303 जागा असलेल्या भाजपावर धर्मनिरपेक्ष शब्द हटवण्यासाठी दबाव आणणार का? असे विचारले असता त्यावर भाष्य करण्यास नंदकुमार यांनी नकार दिला.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघIndiaभारतPoliticsराजकारण