शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 16:38 IST

RSS Chief Mohan Bhagwat News: ५० वर्षांचा आढावा घेतल्यास असे दिसले की, सनातन आणि हिंदू धर्म एकत्र येताच, असुरी शक्तींचे तुकडे झाले. आपल्याला जागे होण्याची गरज आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

RSS Chief Mohan Bhagwat News: पुढील २० ते ३० वर्षांत भारत विश्वगुरू बनेल आणि जगाला मार्गदर्शन करेल. भारताची ही सध्याची गरज आहे की, भारतातील हिंदू समाजाने एक झालं पाहिजे आणि सगळे भेद, मतभेद विसरले पाहिजे. हिंदू समाजाचा, राजांचा पराभव तेव्हाच झाला आहे जेव्हा समाज विभागला गेला किंवा त्यात फूट पडली. हिंदू म्हणून एक व्हा, कुठलाही भेदभाव बाळगू नको. तुम्हाला मैत्री करायची आहे, हे लक्षात ठेवा, आपल्याच माणसांना वैरी समजू नका, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. 

वृंदावनमध्ये सनातन संस्कृती महोत्सव कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत म्हणाले की, आपल्या देशातील संतांची शिकवण आठवा. सगळ्यांनीच आपल्याला भेदाभेद दूर ठेवण्याचा संदेश दिला आहे. सगळ्या हिंदूंनी जातीभेद, मतभेद विसरून एक झाले पाहिजे. आपल्या सगळ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव किंवा भेदाभेद नको. हिंदू समाजातले अंतर्गत वाद हेच आपल्या समुदायाचं नुकसान करत आले आहेत, पराभूत करत आले आहेत. आपण जितके फिरू, समाजात वावरू तेवढे आपल्याला समाजाबाबत समजेल, असे मोहन भागवत यांनी नमूद केले.

हिंदू समजाने एकत्र आले पाहिजे ही गरज आहे

हिंदू समाज हा एक आहे. पण जग आपल्याला जाती, भाषा, धर्म, पंथ, संप्रदाय म्हणून पाहते. जगाचा हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. जगात जेवढे हिंदू आहेत, त्यांनी हिंदू समाजातील व्यक्तींशी मैत्री केली पाहिजे. सौहार्द बाळगला पाहिजे. एकमेकांच्या घरी जाणे, जेवण करणे, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे या गोष्टी हिंदू समाजातील सगळ्या व्यक्तींनी केल्या पाहिजे. हिंदू समजाने एकत्र आले पाहिजे ही गरज आहे. एखादी परिस्थिती तोपर्यंतच असते, जेव्हा आपण तिला घाबरतो किंवा त्यापासून मागे हटतो. आपण ठामपणे एकत्र उभे राहिलो, तर जगात अशी कोणतीही शक्ती नाही, जी आपल्यासमोर उभी राहू शकेल. अशी कोणतीही गोष्ट किंवा परिस्थिती नाही जी आपण जिंकू शकत नाही. आपल्याला फक्त जागे होण्याची आणि दोन पावले पुढे जाण्याची गरज आहे, असे मोहन भागवत म्हणाले. 

दरम्यान, हिंदू समाज आणि सनातन समाज एकत्र येतील, तसे आसुरी शक्ती नुकसान करू शकणार नाहीत. पराभव हा विभाजनामुळे झाला. आपण हे आधी पाहिले आहे की, ते आपले काहीच बिघडवू शकत नाहीत. आपण तयारीत नव्हतो म्हणून ते डोक्यावर नाचत होते. त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. ते पोखरले गेले आहेत. त्यांना जगभरातून पराभूत व्हावे लागत आहे. भविष्यात ते स्वतःहून कोसळतील. आपण एकत्र येताच ते विखुरले जातील. गेल्या ५० वर्षांचा आढावा घेतल्यास असे दिसले की, सनातन आणि हिंदू धर्म एकत्र येताच, त्यांचे तुकडे झाले, असेही त्यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Hindu society must unite; India will guide world: Mohan Bhagwat.

Web Summary : Mohan Bhagwat urges Hindu society to unite, forsaking divisions. He envisions India as a global leader within 20-30 years, emphasizing unity to prevent past defeats rooted in societal fragmentation. He advocates for harmony and mutual support among Hindus.
टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत