शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

"...म्हणून RSS आणि BJP ला जात जनगणना नकोय", काँग्रेसचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 18:04 IST

गेल्या काही काळापासून देशात जात जनगणनेचा मुद्दा पेटला आहे.

Caste Census : देशात सध्या जातीय जनगणनेचा (caste census) मुद्दा चांगलाच पेटला आहे. विरोधक सातत्याने जात जनगणनेची मागणी करत आहेत, तर सत्ताधारी भाजपा यावर काहीच बोलायला तयार नाही. अशातच, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) जातीय जनगणनेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावर आता काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. आरएसएस आणि भाजपा जात जनगणनेच्या विरोधात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवर एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यात म्हटले की, "आरएसएसने जात जनगणनेला उघडपणे विरोध केला आहे. आरएसएसचे म्हणणे आहे की, जातीय जनगणना समाजासाठी चांगली नाही. भाजप आणि आरएसएसला जात जनगणना करायची नाही, हे या विधानावरुन स्पष्ट होते. त्यांना दलित, मागासवर्गीय, आदिवासींना त्यांचे हक्क द्यायचे नाहीत. पण, लिहून घ्या...जात जनगणना होईल आणि ती काँग्रेस करेल," असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

RSS ने काय म्हटले ?आरएसएसचे प्रसिद्धी प्रमुख सुनील आंबेकर म्हणाले की, केवळ राजकीय फायद्यासाठी जात जनगणना करू नये.  हिंदू धर्मात जात ही संवेदनशील बाब आहे. याचा निवडणुकीच्या पलीकडे विचार व्हायला हवा. कोणाच्या प्रगतीसाठी आवश्यक असेल तर जात जनगणना झाली पाहिजे, पण फक्त निवडणुकीचा लाभ मिळवण्यासाठी जात जनगणना करू नये. जात जनगणना हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. त्यामुळे समाजाची एकता आणि अखंडता धोक्यात आली आहे. आपल्या समाजात जातीय प्रतिक्रियांचा मुद्दा संवेदनशील आहे आणि तो राष्ट्रीय एकात्मतेसाठी महत्त्वाचा आहे, परंतु जातीच्या जनगणनेचा उपयोग निवडणुकीसाठी न करता विशेषत: दलितांच्या कल्याणासाठी केला पाहिजे. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा