शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

गोदावरी नदीच्या पुरामुळे आंध्र प्रदेशमध्ये 600 कोटी रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 14:53 IST

आंध्र प्रदेशात पुरामुळे पिकांचे 600 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिली आहे.

हैदराबाद- केरळमध्ये आलेल्या प्रचंड पुरामुळे संपूर्ण केरळ राज्यातील जनजीवन उद्धवस्त झाले आहे. त्याचप्रमाणे जोरदार पावसामुळे कर्नाटकच्या कोडुगू जिल्ह्यातही कॉफी आणि मसाल्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यापाठोपाठ आता गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे आंध्र प्रदेश राज्यातही मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आंध्र प्रदेशात पुरामुळे पिकांचे 600 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिली आहे.

चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने शेतकऱ्यांना प्रतीहेक्टर 25 हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. पूर्वगोदावरीच्या 19 मंडलपैकी 43 गावे आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील 25 मंडलातील 197 गावांमध्ये पुरामुळे नुकसान झाल्याचे नायडू यांनी सांगितले आहे. नायडू यांनी पूरग्रस्त भागाची पाहाणी करुन राजमहेंद्रावरम येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि मदतकार्याची माहिती माध्यमांना दिली. पूर्व गोदावरी जिल्ह्यात 6400 हेक्टर भातशेती व फळबागांचे नुकसान ढासे आहे.49 गावांचा संपर्क तुटला असून 16 निवाराछावण्यांमध्ये 2912 लोकांना आश्रय़ देण्यात आला आहे. यापुरामुळे 250 घरांचे नुकसान झाले आहे. या घरांच्या पुनर्बांधणीसाठी सरकार 1.50 लाख रुपयांची मदत करणार आहे. 

टॅग्स :godavariगोदावरीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAndhra Pradeshआंध्र प्रदेशfloodपूर