शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

काश्मीरमध्ये तीन महिन्यांत १० हजार कोटी रुपयांचा फटका; व्यापारी संघटनेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 06:23 IST

कलम ३७0 रद्द केल्यानंतर लावलेल्या विविध निर्बंधांचा परिणाम

श्रीनगर : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव लावण्यात आलेल्या विविध निर्बंधांमुळे मागील तीन महिन्यांत काश्मीर खोऱ्यात व्यावसायिक समुदायांना १०,००० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. एका व्यापारी संघटनेने हा दावा केला आहे.

केंद्र सरकारने पाच आॅगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केले होते. त्यानंतर सुरक्षेचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. रविवारी या निर्बंधांना ८४ दिवस झाले आहेत. या निर्बंधांमुळे मुख्य बाजारपेठा अधिकांश वेळ बंदच राहिल्या व सार्वजनिक परिवहनही रस्त्यांपासून दूर राहिली.

काश्मीर वाणिज्य व उद्योग मंडळ, या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शेख आशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या लाल चौक भागातील काही दुकाने सकाळच्या वेळी व सायंकाळी अंधारात काही काळ उघडली जातात. मात्र, मुख्य बाजारपेठ बंदच आहे. प्रत्यक्ष किती नुकसान झाले, याचा अंदाज लावणे अशक्य आहे. कारण येथील स्थिती अद्यापही सामान्य झालेली नाही. या काळात व्यावसायिक समुदायाला मोठा फटका बसला आहे व यातून वर येणे अवघड दिसत आहे.

शेख आशिक म्हणाले की, काश्मीरमध्ये आतापर्यंत बाजारपेठेचे १०,००० कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. तीन महिने झाले तरी स्थिती सामान्य होत नाही. काही ठिकाणी बाजार आठवड्यातून काही काळ उघडण्यास सुरुवात झालेली आहे; परंतु कामकाज मंदावलेलेच आहे.

व्यवसायात मोठे नुकसान होण्याचे प्रमुख कारण म्हणजे इंटरनेट सेवा बंद असणे हेच आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, कोणताही व्यवसाय सुरू असण्यासाठी इंटरनेट सेवा सुरू असणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय काम करणे अशक्य आहे. याबाबत आम्ही राज्यपाल, प्रशासनाला अवगत केलेले आहे. त्यांना सांगितले की, काश्मीरमध्ये व्यवसायांना फटका बसला आहे. आगामी काळात याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

शेख आशिक यांनी सांगितले की, हस्तशिल्प क्षेत्राचे उदाहरण घेतले तर संबंधित लोकांना जुलै-आॅगस्ट महिन्यात कामाच्या आॅर्डर मिळतात. त्या ख्रिसमस सण म्हणजेच नव्या वर्षाच्या प्रारंभी पूर्ण केल्या जातात. आता या आॅर्डर हे कारागीर कधी पूर्ण करतील? इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल तरच त्यांना काम मिळेल. याच्या अभावामुळे ५० हजारांच्या आसपास कारागिरांचा रोजगार गेला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370