शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये तीन महिन्यांत १० हजार कोटी रुपयांचा फटका; व्यापारी संघटनेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 06:23 IST

कलम ३७0 रद्द केल्यानंतर लावलेल्या विविध निर्बंधांचा परिणाम

श्रीनगर : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव लावण्यात आलेल्या विविध निर्बंधांमुळे मागील तीन महिन्यांत काश्मीर खोऱ्यात व्यावसायिक समुदायांना १०,००० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. एका व्यापारी संघटनेने हा दावा केला आहे.

केंद्र सरकारने पाच आॅगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केले होते. त्यानंतर सुरक्षेचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. रविवारी या निर्बंधांना ८४ दिवस झाले आहेत. या निर्बंधांमुळे मुख्य बाजारपेठा अधिकांश वेळ बंदच राहिल्या व सार्वजनिक परिवहनही रस्त्यांपासून दूर राहिली.

काश्मीर वाणिज्य व उद्योग मंडळ, या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शेख आशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या लाल चौक भागातील काही दुकाने सकाळच्या वेळी व सायंकाळी अंधारात काही काळ उघडली जातात. मात्र, मुख्य बाजारपेठ बंदच आहे. प्रत्यक्ष किती नुकसान झाले, याचा अंदाज लावणे अशक्य आहे. कारण येथील स्थिती अद्यापही सामान्य झालेली नाही. या काळात व्यावसायिक समुदायाला मोठा फटका बसला आहे व यातून वर येणे अवघड दिसत आहे.

शेख आशिक म्हणाले की, काश्मीरमध्ये आतापर्यंत बाजारपेठेचे १०,००० कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. तीन महिने झाले तरी स्थिती सामान्य होत नाही. काही ठिकाणी बाजार आठवड्यातून काही काळ उघडण्यास सुरुवात झालेली आहे; परंतु कामकाज मंदावलेलेच आहे.

व्यवसायात मोठे नुकसान होण्याचे प्रमुख कारण म्हणजे इंटरनेट सेवा बंद असणे हेच आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, कोणताही व्यवसाय सुरू असण्यासाठी इंटरनेट सेवा सुरू असणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय काम करणे अशक्य आहे. याबाबत आम्ही राज्यपाल, प्रशासनाला अवगत केलेले आहे. त्यांना सांगितले की, काश्मीरमध्ये व्यवसायांना फटका बसला आहे. आगामी काळात याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

शेख आशिक यांनी सांगितले की, हस्तशिल्प क्षेत्राचे उदाहरण घेतले तर संबंधित लोकांना जुलै-आॅगस्ट महिन्यात कामाच्या आॅर्डर मिळतात. त्या ख्रिसमस सण म्हणजेच नव्या वर्षाच्या प्रारंभी पूर्ण केल्या जातात. आता या आॅर्डर हे कारागीर कधी पूर्ण करतील? इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल तरच त्यांना काम मिळेल. याच्या अभावामुळे ५० हजारांच्या आसपास कारागिरांचा रोजगार गेला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370