शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये तीन महिन्यांत १० हजार कोटी रुपयांचा फटका; व्यापारी संघटनेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 06:23 IST

कलम ३७0 रद्द केल्यानंतर लावलेल्या विविध निर्बंधांचा परिणाम

श्रीनगर : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव लावण्यात आलेल्या विविध निर्बंधांमुळे मागील तीन महिन्यांत काश्मीर खोऱ्यात व्यावसायिक समुदायांना १०,००० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. एका व्यापारी संघटनेने हा दावा केला आहे.

केंद्र सरकारने पाच आॅगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केले होते. त्यानंतर सुरक्षेचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. रविवारी या निर्बंधांना ८४ दिवस झाले आहेत. या निर्बंधांमुळे मुख्य बाजारपेठा अधिकांश वेळ बंदच राहिल्या व सार्वजनिक परिवहनही रस्त्यांपासून दूर राहिली.

काश्मीर वाणिज्य व उद्योग मंडळ, या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शेख आशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या लाल चौक भागातील काही दुकाने सकाळच्या वेळी व सायंकाळी अंधारात काही काळ उघडली जातात. मात्र, मुख्य बाजारपेठ बंदच आहे. प्रत्यक्ष किती नुकसान झाले, याचा अंदाज लावणे अशक्य आहे. कारण येथील स्थिती अद्यापही सामान्य झालेली नाही. या काळात व्यावसायिक समुदायाला मोठा फटका बसला आहे व यातून वर येणे अवघड दिसत आहे.

शेख आशिक म्हणाले की, काश्मीरमध्ये आतापर्यंत बाजारपेठेचे १०,००० कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. तीन महिने झाले तरी स्थिती सामान्य होत नाही. काही ठिकाणी बाजार आठवड्यातून काही काळ उघडण्यास सुरुवात झालेली आहे; परंतु कामकाज मंदावलेलेच आहे.

व्यवसायात मोठे नुकसान होण्याचे प्रमुख कारण म्हणजे इंटरनेट सेवा बंद असणे हेच आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, कोणताही व्यवसाय सुरू असण्यासाठी इंटरनेट सेवा सुरू असणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय काम करणे अशक्य आहे. याबाबत आम्ही राज्यपाल, प्रशासनाला अवगत केलेले आहे. त्यांना सांगितले की, काश्मीरमध्ये व्यवसायांना फटका बसला आहे. आगामी काळात याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

शेख आशिक यांनी सांगितले की, हस्तशिल्प क्षेत्राचे उदाहरण घेतले तर संबंधित लोकांना जुलै-आॅगस्ट महिन्यात कामाच्या आॅर्डर मिळतात. त्या ख्रिसमस सण म्हणजेच नव्या वर्षाच्या प्रारंभी पूर्ण केल्या जातात. आता या आॅर्डर हे कारागीर कधी पूर्ण करतील? इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल तरच त्यांना काम मिळेल. याच्या अभावामुळे ५० हजारांच्या आसपास कारागिरांचा रोजगार गेला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370