उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. २१ लाख रुपये आणि हुंड्यात फॉर्च्युनर गाडी न मिळाल्याने सासरच्यांनी विवाहित महिलेला मारहाण केल्याचे समोर आले आहे.विवाहितेवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले होते. एक दिवस तिच्या सासरच्यांनीही तिचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे.
उल्हासनगरमध्ये धुळवडीच्या उत्सवाला 'गालबोट', मुलीच्या छेडछाडीसह हाणामारीच्या ४ घटना
विवाहितेने या प्रकरणाची तक्रार तिच्या सासू आणि पतीकडे केली तेव्हा तिला मारहाण करण्यात आली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
विजय नगर पोलीस स्टेशन परिसरातील या मुलीचा विवाह दोन वर्षांपूर्वी कवी नगर पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणाशी झाला होता. तिच्या कुटुंबाने लग्नात ४५ लाख रुपये खर्च केले आणि हुंडा म्हणून रोख रक्कम, दागिने, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि एक कार दिली.
लग्नाच्या अवघ्या १५ दिवसांनी तिच्या पतीने ५ लाख रुपयांची मागणी केली, ही मागणी पीडितेच्या वडिलांनी पूर्ण केली. यानंतरही सासरच्यांच्या मागण्या वाढतच गेल्या आणि २१ लाख रुपये रोख आणि फॉर्च्युनर कारची मागणी करण्यात आली.
सासरच्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तेव्हा विवाहितेला मारहाण करण्यात आली, शिवीगाळ करण्यात आली आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तिच्या सासरच्यांनीही तिचा विनयभंग केला,अशा आरोपही विवाहितेने केला. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पीडितेने मुलाला जन्म दिला. पण तरीही विवाहितेच्या सासरच्या लोकांच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही.
यावेळी वडिलांच्या हस्तक्षेपानंतर, पीडिता अनेक वेळा तिच्या सासरच्या घरी गेली, पण प्रत्येक वेळी हिंसाचारामुळे तिला तिच्या पालकांच्या घरी परतावे लागले.
डिसेंबरमध्ये, जेव्हा ती तिच्या आईवडिलांच्या घरी होती, तेव्हा तिच्या सासरच्या लोकांनी येऊन तिला मारहाण केली. तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. असा आरोप पीडितेचा आहे.
त्रासलेल्या पीडितेने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.