शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

RRB NTPC Protest: बिहारमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिकच हिंसक, दगडफेकीनंतर पॅसेंजर ट्रेनला लावली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 14:48 IST

RRB NTPC Protest: बिहारमधील गया येथे रेल्वेच्या परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन अधिकच हिंसक झाले आहे. आज हजारो विद्यार्थ्यांनी गया जंक्शन येथे जमा होत उग्र आंदोलन केले.

पाटणा - बिहारमधील गया येथे रेल्वेच्या परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन अधिकच हिंसक झाले आहे. आज हजारो विद्यार्थ्यांनी गया जंक्शन येथे जमा होत उग्र आंदोलन केले. तसेच आंदोलक विद्यार्थ्यांनी सुरुवातीला गया जंक्शनवर उभ्या असलेल्या श्रमजीवी एक्स्प्रेसवर दगडफेक केली. तसेच पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी लाठीमार करून या विद्यार्थ्यांना पांगवल्यावर त्यांनी स्टेशनवर आधीपासून उभ्या असलेल्या एका ट्रेनच्या डब्यांना आग लावली.

गया जंक्शनवर गोंधळ घातल्यानंतर या विद्यार्थ्यांनी करीमगंजजवळ आधीपासून उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनला या विद्यार्थ्यांनी लक्ष्य केले. तसेच ट्रेनच्या डब्यांना आग लावली. त्यामुळे ट्रेनचे काही डबे जळाले. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात आल्याने जिल्हा पोलीसआणि रेल्वे पोलिसांनी मोर्चा सांभाळला आहे. आंदोलनकर्ते विद्यार्थी सातत्याने रेल्वेच्या परीक्षेत गडबड झाल्याचा आरोप करत आहेत. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. मात्र सध्यातरी घटनास्थळावरील परिस्थिती तणावपूर्ण आहे.

दरम्यान,  रेल्वे विभागातील आरआऱबी एनटीपीसी परीक्षेच्या निकालामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप बिहारमधील विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. १४ जानेवारी रोजी लागलेल्या आरआऱबी एनटीपीसीच्या निकालानंतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून बिहारमधील रेल्वे सेवा कोलमडली आहे.  यादरम्यान, विद्यार्थ्यांनी रेल्वेच्या इंजिनाला आग लावल्याची घटनाही घडली होती.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेStudentविद्यार्थीBiharबिहार