शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

दलाई लामांबाबतची भूमिका बदलली नाही, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 12:44 AM

तिबेटीयन बौद्ध धर्मगुरू दलाई लामांबाबतची भूमिका केंद्र सरकारने बदललेली नाही़ त्यांना भारतात धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. 

नवी दिल्ली : तिबेटीयन बौद्ध धर्मगुरू दलाई लामांबाबतची भूमिका केंद्र सरकारने बदललेली नाही. त्यांना भारतात धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. दलाई लामा यांच्या कार्यक्रमांपासून दूर राहा, असे फर्मान परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी मंत्री व सनदी अधिका-यांना गेल्या महिन्यात बजावले होते. चीनचे परराष्ट्र मंत्री व सचिव यांची भेट घेण्यासाठी गोखले चीनला गेले होते. त्याआधी त्यांनी हे फर्मान जारी केले. या फर्मानाचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले होते.त्यावर खुलासा करताना परराष्ट्र मंत्रालयाने वरील स्पष्टीकरण दिले़ दलाई लामांबाबत कोणतेही फर्मान जारी केलेले नाही. लामांविषयी भारताने भूमिका बदललेली नाही. त्यांना भारतात धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.>लामा यांना आश्रय देऊ नका- चीनभारत व चीनमध्ये युद्ध सुरू होईल, असे चित्र गेले काही महिने सीमारेषेवर होते़ युद्धजन्य परिस्थिती निवळण्यासाठी उभय देशांमध्ये चर्चा सुरू आहे़ दलाई लामांविषयी चीन सुरुवातीपासूनच द्वेषी आहे़ लामा यांना आश्रय देऊ नका, असे जाहीरपणे चीन सर्व देशांना सांगतो़ भारत सरकार मात्र दलाई लामांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे़अचानकपणे मोदी सरकारने लामांविषयी भूमिका बदलल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही लामा समर्थक देशांच्या भुवया उंचावल्या होत्या़ लामा यांनी याविषयी कोणतेही भाष्य केलेले नाही़इंग्रजी दैनिकाचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर केंद्र सरकारवर चांगलीच टीका झाली़ चीनला खूश करण्यासाठी हे फर्मान जारी केले होते, असा आरोपही झाला होता़ केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केल्याने हा वाद निवळण्याची चिन्हे आहेत़

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामा