शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणादायी! MBA पास तरुणाने नोकरी सोडली अन् शक्कल लढवली; 'अशी' करतोय लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 12:21 IST

MBA pass youth quit his job and started business : नोकरी सोडल्यानंतर एका व्यक्तीने स्टार्टअप अंतर्गत दुधाचा व्यवसाय सुरू केला आणि महिन्याभरात लाखोंची कमाई केली आहे.

नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. नोकरी सोडल्यानंतर एका व्यक्तीने स्टार्टअप अंतर्गत दुधाचा व्यवसाय सुरू केला आणि महिन्याभरात लाखोंची कमाई केली आहे. प्रदीप श्योराण असं या व्य़क्तीचं नाव असून ते हरियाणाचा रहिवासी आहे. प्रदीप यांनी 2018 मध्ये नोकरी सोडली आणि बागरी मिल्क पार्लर सुरू केले. पूर्वी हा फक्त एक छोटा स्टॉल होता आणि आज रोहतकमध्ये त्यांचे एक चांगले आऊटलेट आहे. सुरुवातीला दुधापासून सुरू झालेला हा व्यवसाय आज विविध प्रकारच्या 20 उत्पादनांपर्यंत पोहोचला आहे.

हरियाणातीलच नाही तर दिल्ली, पंजाब, राजस्थानमधूनही लोक प्रदीपच्या "बागडी मिल्क पार्लर"मध्ये येत असतात. या संदर्भात प्रदीप यांनी लहान-मोठ्या शहरातील सुशिक्षित आणि शेतकरी कुटुंबातील तरुण अशा प्रकारे स्वत:चे काम करून कुटुंबाला पुढे नेऊ शकतात. प्रदीप हे मूळचे हरियाणातील चरखी दादरी या जिल्ह्यातील मांढी पिरानू गावचे रहिवासी आहेत. ते शेतकरी कुटुंबातील असून त्याचे वडील शाळेत नोकरी करायचे. प्रदीप यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि सिव्हिल परीक्षेची तयारी सुरू केली, पण त्यात यश न मिळाल्याने त्याने एमबीएला प्रवेश घेतला. 

एमबीएची पदवीही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. पण सुरुवातीला त्यांना हवी तशी नोकरी मिळू शकली नाही. काही काळानंतर त्यांना व्हेल्स इलेक्ट्रिकमध्ये चांगली नोकरी मिळाली आणि ते त्या कंपनीत 2018 पर्यंत होते. नोकरीत त्यांना अनेकवेळा प्रमोशनही मिळाले आणि पगारही चांगला होता. पण या कामातून त्यांना समाधान मिळत नव्हते. प्रदीप यांनी नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांची स्वतःची काही बचत होती आणि कुटुंबातील काही सदस्यांचाही पाठिंबा मिळाला. 2018 मध्ये नोकरी सोडून त्यांनी सुमारे 24 राज्यांतील विविध शेतकरी, व्यावसायिकांना भेटी दिल्या. 

प्रदीप यांना बिझनेस तर करायचाच होता पण असा काही बिझनेस करायचा होता ज्याला मार्केट मध्ये डिमांड आहे आणि जो चालणार आहे. प्रदीप यांनी त्यांच्या सर्व दौऱ्यांमधून त्यांना एकच गोष्ट समजली की शेतकरी तीन प्रकारचे व्यवसाय करू शकतात - पहिला तृणधान्ये, कडधान्ये इत्यादी, दुसरा दूध आणि तिसरा अंडी इ. त्यामुळे आम्ही दूध व्यवसायाकडे जाण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं. रोहतकमध्ये दोन मोठी उद्याने आहेत, जिथे सकाळी आणि संध्याकाळी खूप गर्दी असते. या उद्यानांच्या बाहेर त्यांनी आपले ‘बागडी मिल्क पार्लर’ सुरू केले. त्यांनी डिसेंबर 2018 मध्ये सुरुवात केली तेव्हा थंडीच्या काळात ते मातीच्या कुल्हडमध्ये गरम दूध द्यायचे.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी