शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

रोहिंग्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोका, केंद्राचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 18:49 IST

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून रोहिंग्या मुसलमान शरणार्थी म्हणून भारतात राहू शकत नाही असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली, दि. 14 - केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून रोहिंग्या मुसलमान शरणार्थी म्हणून भारतात राहू शकत नाही असं म्हटलं आहे. प्रतिज्ञापत्रात रोहिंग्या मुसलमान भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोका असल्याचं केंद्राने म्हटलं आहे. देशाच्या सुरक्षेसाठी रोहिंग्या मुस्लिमांचं भारताबाहेर जाणं गरजेचं आहे. कोणत्याही अवैध स्थलांतरिताला भारतात राहण्याचा अधिकार नाही असं केंद्राने प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. रोहिंग्यांच्या पाठवणीविरोधातील याचिकेवर 18 सप्टेंबर रोजी सुनावणी-भारतात बेकायदेशीररित्या राहात असलेल्या रोहिंग्यांना पुन्हा मायदेशी पाठवण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेबाबत अतिरिक्त साँलिसिटर जनरल तुषार मेहता यांना केंद्र सरकारचे मत काय आहे याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. या खंडपिठामध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा, ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचूड यांचा समावेश आहे.भारतात राहात असलेल्या रोहिंग्यांची आकडेवारी प्रसिद्ध करुन केंद्र सरकारने सर्वात जास्त रोहिंग्या जम्मू आणि काश्मीर राज्यात राहात असल्याचे स्पष्ट केले होते. या रोहिंग्यांना पुन्हा पाठवण्याचा मानस सरकारने व्यक्त केल्यावर दोन स्थलांतरित  रोहिंग्या आश्रित मोहम्मद सलिमुल्लाह आणि मोहम्मद शाकिर यांनी त्याला याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. या दोघांच्या मते ते यूएनएचसीआरच्या ( युनायटेड नेशन्स हाय कमिशन आँफ रेफ्युजीज)  नियमांनुसार नोंदणीकृत आश्रित असून ते म्यानमारमधून जीव वाचवण्याच्या उद्देशाने भारतात आलेले आहेत. ही याचिका ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आली आहे. याचिकेत त्यांनी रोहिंग्याना परत पाठवण्याची योजना मूलभूत अधिकारांविरोधात आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांविरोधात असल्याचे म्हटले आहे. रोहिंग्यांना परत पाठवण्याची योजना घटनेतील कलम १४, २१ आणि ५१(क) विरुद्ध असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. इतकेच नव्हे तर रोहिंग्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे. भारताने विविध करारांमध्ये नाँन रिफोलमेंट हे तत्त्व मान्य केले आहे. (म्हणजेच जिवाला धोका असणार्या प्रदेशातील आश्रितांचे रक्षण करुन त्यांच्यावर परत जाण्यास दबाव न आणण्याचे तत्त्व) भारताने वेळोवेळी गरजू आश्रितांसाठी आपली दारं खुली केली आहेत अशी आठवणही याचिकेत करुन देण्यात आली आहे. यूएनएचसीआरने केंद्र सरकारच्या या रोहिंग्यांना परत पाठवण्याच्या योजनेबाबत १८ आँगस्ट रोजीच नोटीस बजावलेली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय