शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

रस्ता १८ कोटींचा, खर्च केले २५० कोटी; कॅगच्या अहवालातून ७ प्रकल्पांमधील गैरव्यवहार समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 05:36 IST

या सर्व गैरव्यवहारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विविध सात पायाभूत प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) यांनी उघड केले आहे. त्यापैकी दिल्लीच्या द्वारका द्रुतगती महामार्गाचा निर्मितीखर्च प्रतिकिलोमीटर १८ कोटींवरून २५० कोटींपर्यंत वाढल्याचे उघड झाले. या सर्व गैरव्यवहारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. 

कॅगच्या अहवालात केंद्र सरकारच्या अख्यतारितील सात प्रकल्पांतील गैरव्यवहार झाल्यानंतर पंतप्रधान गप्प आहेत. कदाचित ते कॅगचा अहवाल तयार करणाऱ्यांना राष्ट्रद्रोही घोषित करून तुरुंगात टाकतील, असे कॉंग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या.द्वारका द्रुतगती महामार्गाचा खर्च १८ कोटींवरून २५० कोटी झाल्याचा कॅगचा आरोप केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने फेटाळला. कॅगने मांडलेल्या अहवालात अन्य खर्च गृहित धरला नाही. त्यामुळे सरसकट खर्च वाढला म्हणणे योग्य नाही. उलट प्रकल्पाच्या एकूण खर्चात १२ टक्के बचत झाल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.

काँग्रेस म्हणते कॅगने दाखवला आरसा

भारतमाला प्रकल्प : महामार्ग निर्मितीच्या या प्रकल्पासाठी बांधकामाचा प्रतिकिलोमीटर खर्च १५.३७ कोटी रुपयांवरून तब्बल ३२ कोटी दाखवण्यात आला. त्याशिवाय निविदा प्रक्रियेतही काळेबेरे झाले असून सुमारे ३,५०० कोटी अन्यत्र वळवण्यात आले. सुरक्षा सल्लागाराचीही नेमणूक करण्यात आली नाही.

टोल घोटाळा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या केवळ पाच टोलनाक्यांद्वारे १३२ कोटींचा लूट करण्यात आली. सर्व टोलनाक्यांची तपासणी केल्यास हा आकडा कित्येक पट वाढू शकतो.

आयुष्मान भारत : ७.५ लाख लाभार्थ्यांची केवळ एका मोबाइल क्रमांकावरून नोंद करण्यात आली. तसेच उपचारादरम्यान मृत झालेल्या ८८ हजार रुग्णांचे बिल पास केले.

अयोध्या विकास प्रकल्प : कवडीमोल दराने भूखंड विकत घेऊन तो राम मंदिर ट्रस्टला चढ्या दराने विकण्यात आला. नोंदणीकृत नसलेल्या कंत्राटदारांना पैसे वळते करण्यात आले.

पेन्शनचा निधी फलकांवर खर्च : ज्येष्ठ नागरिक, गरीब, विधवा तसेच अपंगाच्या पेन्शनचा निधी ‘स्वच्छ भारत’ योजनेचे फलक लावण्यासाठी एका रात्रीत वळवण्यात आला.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स : सदोष इंजिन विकसित केल्यामुळे सुमारे १५४ कोटींचे नुकसान झाले.

द्वारका एक्स्प्रेस वे : प्रकल्पाच्या बांधकामाचा खर्च प्रतिकिलोमीटर १८ कोटींवरून सुमारे २५० कोटींवर दाखवला.

पैसा नेमका कुठे गेला?

कॅगने आक्षेप घेतलेल्या या गैरव्यवहारांबाबत पंतप्रधान गप्प का आहेत. लोकांच्या आरोग्याशी संबंधित आयुष्मान भारत योजनेलाही भ्रष्टाचाराची कीड लागली. हा पैसा नेमका कुठे गेला, असा सवालही कॉंग्रेसने केला.

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकcongressकाँग्रेस