शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
4
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
5
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
6
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
7
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
8
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
9
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
10
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
11
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
12
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
13
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
14
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
15
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
16
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
17
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
18
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
19
ITR भरल्यानंतर आता तासाभरात परतावा! आयकर विभागाचा स्पीड पाहून नागरिक थक्क, जाणून घ्या कसं झालं शक्य?
20
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 

देशात रस्ते अपघातात १२ टक्क्यांनी वाढ, धक्कादायक रिपोर्ट आला समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 13:22 IST

गेल्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये एकूण ४,६१,३१२ रस्ते अपघातांची नोंद झाली, ज्यामध्ये १,६८,४९१ लोकांचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासंदर्भातील रिपोर्ट केंद्र सरकारने जाहीर केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात रस्ते अपघातांमध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच, या रिपोर्टमध्ये रस्ते अपघात वाढण्याची कारणेही नमूद करण्यात आली आहेत. 

रिपोर्टनुसार, गेल्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये एकूण ४,६१,३१२ रस्ते अपघातांची नोंद झाली, ज्यामध्ये १,६८,४९१ लोकांचा मृत्यू झाला. तर  ४,४३,३६६ लोक अपघाताच्या घटनेत जखमी झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत रस्ते अपघातात ११.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मृतांमध्ये ९.४ टक्के आणि जखमींच्या संख्येत १५.३ टक्के वाढ झाली आहे.

या कारणांमुळे रस्ते अपघात?रस्ते अपघातांचे सर्वात मोठे कारण ओव्हरस्पीडिंग असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. याशिवाय, बेदरकारपणे वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे, अशा कारणांमुळे रस्ते अपघातात वर्षानुवर्षे वाढ होत आहे.

हेल्मेट न घालणे सर्वात धोकादायक!रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हेल्मेट नसल्यामुळे बाईक चालवताना झालेल्या अपघातात ५० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे आहे. बाईक चालवताना झालेल्या अपघातात ३५,६९२ लोकांचा मृत्यू झाला. तर १४, ३३७लोक हेल्मेटशिवाय दुचाकीवर बसल्याने मरण पावले.

सीट बेल्ट न लावणे हे देखील मृत्यूचे कारणआकडेवारीनुसार, सीट बेल्ट न बांधलेल्या १६,७१५ लोकांचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यापैकी ८३०० लोक कार चालवत होते, तर ८३३१ लोक कारमधून प्रवास करत होते. दरम्यान, अशा रस्ते अपघातांपासून लोकांना वाचवायचे असेल तर त्यांना जागरूक करावे लागेल, जेणेकरून अधिकाधिक जीव वाचवता येतील. चालकांसाठी विविध शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याची गरज आहे, असे सरकारचे मत आहे.

टॅग्स :AccidentअपघातIndiaभारत