शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

देशात रस्ते अपघातात १२ टक्क्यांनी वाढ, धक्कादायक रिपोर्ट आला समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 13:22 IST

गेल्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये एकूण ४,६१,३१२ रस्ते अपघातांची नोंद झाली, ज्यामध्ये १,६८,४९१ लोकांचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासंदर्भातील रिपोर्ट केंद्र सरकारने जाहीर केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात रस्ते अपघातांमध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच, या रिपोर्टमध्ये रस्ते अपघात वाढण्याची कारणेही नमूद करण्यात आली आहेत. 

रिपोर्टनुसार, गेल्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये एकूण ४,६१,३१२ रस्ते अपघातांची नोंद झाली, ज्यामध्ये १,६८,४९१ लोकांचा मृत्यू झाला. तर  ४,४३,३६६ लोक अपघाताच्या घटनेत जखमी झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत रस्ते अपघातात ११.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मृतांमध्ये ९.४ टक्के आणि जखमींच्या संख्येत १५.३ टक्के वाढ झाली आहे.

या कारणांमुळे रस्ते अपघात?रस्ते अपघातांचे सर्वात मोठे कारण ओव्हरस्पीडिंग असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. याशिवाय, बेदरकारपणे वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे, अशा कारणांमुळे रस्ते अपघातात वर्षानुवर्षे वाढ होत आहे.

हेल्मेट न घालणे सर्वात धोकादायक!रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हेल्मेट नसल्यामुळे बाईक चालवताना झालेल्या अपघातात ५० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे आहे. बाईक चालवताना झालेल्या अपघातात ३५,६९२ लोकांचा मृत्यू झाला. तर १४, ३३७लोक हेल्मेटशिवाय दुचाकीवर बसल्याने मरण पावले.

सीट बेल्ट न लावणे हे देखील मृत्यूचे कारणआकडेवारीनुसार, सीट बेल्ट न बांधलेल्या १६,७१५ लोकांचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यापैकी ८३०० लोक कार चालवत होते, तर ८३३१ लोक कारमधून प्रवास करत होते. दरम्यान, अशा रस्ते अपघातांपासून लोकांना वाचवायचे असेल तर त्यांना जागरूक करावे लागेल, जेणेकरून अधिकाधिक जीव वाचवता येतील. चालकांसाठी विविध शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याची गरज आहे, असे सरकारचे मत आहे.

टॅग्स :AccidentअपघातIndiaभारत