शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
6
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
7
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
8
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
9
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
10
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
11
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
12
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
13
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
14
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
15
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
16
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
17
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
18
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
19
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?
20
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?

कमाई, पढाई, दवाईवर राजदचा भर; बिहारमध्ये तेजस्वी- नितीशकुमारांमध्ये काट्याची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 06:16 IST

Bihar Assembly Election 2020 : आतापर्यंत भाजप आणि जदयू हे अजेंडा तयार करायचे आणि विरोधकही त्यावर चर्चा करायचे. मात्र, यंदा प्रथमच यात बदल झाला आहे. ही निवडणूक आता कमाई, पढाई आणि दवाई (रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधा) यावर केंद्रित झाली आहे, असे राजदचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले. 

पाटणा : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर राजदच्या नेतृत्वातील महाआघाडी आणि नितीशकुमारांच्या नेतृत्वातील आघाडी यांच्यातील लढत अधिक तीव्र झाली आहे. आतापर्यंत भाजप आणि जदयू हे अजेंडा तयार करायचे आणि विरोधकही त्यावर चर्चा करायचे. मात्र, यंदा प्रथमच यात बदल झाला आहे. ही निवडणूक आता कमाई, पढाई आणि दवाई (रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधा) यावर केंद्रित झाली आहे, असे राजदचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले. भाजप आणि जदयूच्या खेळीपासून तेजस्वी हे अतिशय सावध आहेत. जंगल राज का युवराज ही मोदींची टीका असो की, लालूप्रसादांच्या कुटुंबीयांवर नितीशकुमार करत असलेली टीका असो तेजस्वी यादव हे त्याला उत्तर न देता वास्तविक प्रश्नांवर बोला असे थेट आव्हान देत आहेत. रोजगार, गरिबांमधील शिक्षणाची परिस्थिती आणि आरोग्य यासारख्या विषयांवर तेजस्वी हे लोकांचे लक्ष आकर्षित करत आहेत. तेजस्वी यादव यांनी दहा लाख नोकऱ्यांचे आश्वासन दिले असून, जदयू त्यावर टीका करत आहे. तेजस्वी हे लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप जदयूचे नेते करतआहेत. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि राजदचे सरकार नोकऱ्या देण्याचे आश्वासन का पूर्ण करू शकले नाही, असा सवाल जदयूचे नेते विचारत आहेत. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकTejashwi Yadavतेजस्वी यादवNitish Kumarनितीश कुमार