शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

उत्तर प्रदेशात दंगलींनाच चांगली कामगिरी म्हणतात; राहुल, प्रियांका गांधी यांचे टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 06:32 IST

उत्तर प्रदेश सरकारवर प्रियांका गांधी, राहुल गांधींचा निशाणा. दंगलींनाच चांगली कामगिरी म्हणतात, असं म्हणत केली टीका.

ठळक मुद्देउत्तर प्रदेश सरकारवर प्रियांका गांधी, राहुल गांधींचा निशाणा.दंगलींनाच चांगली कामगिरी म्हणतात, असं म्हणत केली टीका.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी राज्यातील भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. उत्तर प्रदेशात दंगलींनाच चांगली कामगिरी म्हणतात, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, उत्तर प्रदेशात हिंसाचाराचे नाव बदलून मास्टरस्ट्रोक ठेवले आहे. सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्विट केले आहे की, सरकार तेच. घटनाही त्याच. काही वर्षांपूर्वी एका बलात्कार पीडितेने भाजप आमदाराविरुद्ध आवाज उठविला होता. त्यावेळी तिला आणि तिच्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका महिलेचा अर्ज रोखण्यासाठी भाजपने सर्व सीमा ओलांडल्या. 

हिंसाचार कुठे?उत्तर प्रदेशात ब्लॉक प्रमुखांच्या निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्यावेळी गुरुवारी अनेक ठिकाणी हिंसाचार, गोळीबाराच्या घटना घडल्या. कन्नौज, सीतापूर, उन्नाव, लखीमपूर खिरी, गोरखपूर, बहराइजमध्ये हिंसाचार झाला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ