माहुलीच्या गावकर्यांवर दंगलीचा गुन्हा
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:48+5:302015-08-26T23:32:48+5:30

माहुलीच्या गावकर्यांवर दंगलीचा गुन्हा
>६०० जण आरोपी : विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी बसचालक जेरबंदअमरावती : एसटी बसखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या माहुलीच्या (जहांगिर) गावकर्यांना बस व अग्निशमन दलाचे वाहन पेटवून दिल्याप्रकरणी त्यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.मंगळवारी एसटीच्या चाकाखाली चिरडून साहिल डायरे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी चालक संजय गोखणे यास अटक केली आहे. घटनेनंतर गावकर्यांनी वाहने जाळण्याबरोबरच पोलिसांवरही दगडफेक केली होती. त्यात पोलीस जखमी झाले होते. पोलीस शिपाई अरविंद पुरी यांच्या तक्रारीवरून दगडफेक, जाळपोळ, जीवे मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ, बंदूक चोरी प्रकरणीही गावकर्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. चौकशीचा अहवाल महिनाभरात सादर करण्याचे आदेश जिल्हधिकारी किरण गित्ते यांनी बुधवारी जारी केले.(प्रतिनिधी)-------------------------गोळीबाराची कबुलीहवेत गोळीबार केल्याचा मंगळवारी इन्कार करणार्या जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी बुधवारी हवेत तीन राऊंड फायर केल्याचे कबूल केले. पोलिसांनी स्वरक्षणासाठी गोळीबार केला, त्यात आठ गावकरी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. -------------------------आमदारांकडून तक्रारपोलिसांनी विनाकारण लाठीमार केल्याने गावकरी संतापल्याची तक्रार आ. यशोमती ठाकूर यांनी पोलीस महानिरीक्षकांकडे केली.------------------------