शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

साडेतीन वर्षांत दीड लाख अपघातग्रस्तांना नवसंजीवनी; १०८ रुग्णवाहिका वरदान; ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 06:20 IST

अपघातातील गंभीर जखमींवर ‘गोल्डन अवर’मध्ये मोफत उपचार केले जातात. अपघातानंतर १५ ते २० मिनिटांत १०८ रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचते. गंभीर जखमी व उपचारांची तात्काळ आवश्यकता असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळतो. पहिल्या ७२ तासांत ठराविक रकमेपर्यंत उपचारांची तरतूद आहे.

 स्नेहा मोरे -

मुंबई : अपघात हे सांगून होत नसतात, परंतु ते टाळणे अथवा इजा होऊ नये व कमीतकमी दुखापत व्हावी, यासाठी मात्र आपण काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच त्वरित काय उपचार करावेत हेही महत्त्वाचे आहे. राज्यात मागील तीन वर्षांत २०१९ ते २०२२ या काळात १ लाख ५३ हजार ३०० अपघातग्रस्तांना १०८ रुग्णवाहिकेने नवसंजीवनी दिली. अपघातातील गंभीर जखमींवर ‘गोल्डन अवर’मध्ये मोफत उपचार केले जातात. अपघातानंतर १५ ते २० मिनिटांत १०८ रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचते. गंभीर जखमी व उपचारांची तात्काळ आवश्यकता असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळतो. पहिल्या ७२ तासांत ठराविक रकमेपर्यंत उपचारांची तरतूद आहे.  

हे लक्षात ठेवा!- जखमींचा श्वासोच्छ् वास व हृदयाचे ठोके व्यवस्थित आहे का, हे बघा. - रुग्णवाहिकेला बोलवा, हॉस्पिटलशी संपर्क करा. त्याचा रक्तस्राव थांबवा. - हृदयाचे ठोके लागत नसतील तर त्याला तोंडाने कृत्रिम श्वासोच्छ्वास द्या व त्याची छाती हाताने दाबून पंप करा. - फ्रॅक्चर असल्यास त्या भागाला आधार देऊन त्याची हालचाल थांबवा. 

कालावधी    किती अपघातग्रस्तांना मदत२०१९                    ५९०१२ २०२०                   ३६९८६ २०२१                   ४७३०२२०२२                   १०३०५ 

अपघात टाळण्यासाठी व झाल्यानंतर काय करावे, याचे प्रबोधन होण्याचीही गरज आहे. अपघात झाल्यापासून एक तासात उपचार मिळाल्यास रुग्ण बचावण्याची शक्यता असते. या कालावधीला  ‘गोल्डन अवर’ असे संबोधले जाते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला तातडीने रुग्णालयात पोहोचवून उपचार सुरू होणे फार गरजेचे असते. वेळीच उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचवणे शक्य होते.- डॉ. किशोरी बडे, हाडविकार तज्ज्ञ 

टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटल