शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपकडून 344 कोटींहून अधिक खर्च; उत्तर प्रदेशात सर्वाधिक!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 14:48 IST

BJP : निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या माहितीच्या आधारे हे समोर आले आहे. 

नवी दिल्ली :  भारतीय जनता पक्षाने (भाजप) 'या' वर्षी झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत (उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड) 344.27 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर पाच वर्षांपूर्वी या राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने 218.26 कोटी रुपये खर्च केले होते. दुसरीकडे, या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 194.80 कोटी रुपये खर्च केले. दरम्यान, निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या माहितीच्या आधारे हे समोर आले आहे. 

पाच राज्यांपैकी भाजपने 344 कोटी रुपयांपैकी सर्वाधिक 221.32 कोटी रुपये उत्तर प्रदेशात खर्च केले. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत भाजप पुन्हा बहुमताने सत्तेत आला. तर 2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने 175.10 कोटी रुपये खर्च केले होते. म्हणजेच 2022 च्या निवडणुकीत पक्षाचा निवडणूक खर्च 2017 च्या तुलनेत 26 टक्क्यांनी जास्त होता, असे निवडणूक आयोगाकडील आकडेवारीवरून दिसून आले आहे. 

याचबरोबर, भाजपने 2022 मध्ये पंजाबमध्ये 36.70 कोटी रुपये खर्च केले होते, तर 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने 7.43 कोटी रुपये खर्च केले होते. तरीही पक्षाला फक्त दोन जागा जिंकता आल्या, तर 2017 च्या तीन जागांवर विजय मिळवला होता. तर  गोव्यात भाजपने यंदाच्या निवडणुकीत 19.07 कोटी रुपये खर्च केले, जे 2017 मधील 4.37 कोटी रुपयांच्या खर्चाच्या चौपट आहे.

मणिपूर आणि उत्तराखंडमधील 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा निवडणूक खर्च अनुक्रमे 23.52 कोटी रुपये (2017 मध्ये 7.86 कोटी रुपये) आणि 43.67 कोटी रुपये (2017 मध्ये 23.48 कोटी रुपये) होता. पाच राज्यांतील भाजपच्या एकूण निवडणूक खर्चापैकी मोठा हिस्सा त्यांच्या नेत्यांच्या प्रवास, जाहीर सभा, मिरवणुका आणि प्रचारावर खर्च झाला. 

भाजपने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत व्हर्च्युअल प्रचारावर जवळपास 12 कोटी रुपये खर्च केले. दुसरीकडे, काँग्रेस पक्षाच्या निवडणूक खर्चाची राज्यनिहाय माहिती उपलब्ध नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म/अ‍ॅप्स आणि इतर माध्यमातून व्हर्च्युअल मोहिमेवर 15.67 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती काँग्रेसने दिली आहे.

सर्व पक्षांना निवडणूक खर्चाची माहिती द्यावी लागतेलोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यापासून शेवटच्या तारखेपर्यंत रोख, धनादेश किंवा ड्राफ्ट किंवा वस्तू रुपात जमा केलेल्या सर्व पैशांचा हिशेब ठेवणे आवश्यक आहे. यासोबतच पक्षांना विधानसभा निवडणुकीनंतर 75 दिवसांच्या आत आणि लोकसभा निवडणुकीनंतर 90 दिवसांच्या आत आपल्या निवडणूक खर्चाची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करायची असते.

टॅग्स :BJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेस