शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपकडून 344 कोटींहून अधिक खर्च; उत्तर प्रदेशात सर्वाधिक!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 14:48 IST

BJP : निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या माहितीच्या आधारे हे समोर आले आहे. 

नवी दिल्ली :  भारतीय जनता पक्षाने (भाजप) 'या' वर्षी झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत (उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड) 344.27 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर पाच वर्षांपूर्वी या राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने 218.26 कोटी रुपये खर्च केले होते. दुसरीकडे, या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 194.80 कोटी रुपये खर्च केले. दरम्यान, निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या माहितीच्या आधारे हे समोर आले आहे. 

पाच राज्यांपैकी भाजपने 344 कोटी रुपयांपैकी सर्वाधिक 221.32 कोटी रुपये उत्तर प्रदेशात खर्च केले. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत भाजप पुन्हा बहुमताने सत्तेत आला. तर 2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने 175.10 कोटी रुपये खर्च केले होते. म्हणजेच 2022 च्या निवडणुकीत पक्षाचा निवडणूक खर्च 2017 च्या तुलनेत 26 टक्क्यांनी जास्त होता, असे निवडणूक आयोगाकडील आकडेवारीवरून दिसून आले आहे. 

याचबरोबर, भाजपने 2022 मध्ये पंजाबमध्ये 36.70 कोटी रुपये खर्च केले होते, तर 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने 7.43 कोटी रुपये खर्च केले होते. तरीही पक्षाला फक्त दोन जागा जिंकता आल्या, तर 2017 च्या तीन जागांवर विजय मिळवला होता. तर  गोव्यात भाजपने यंदाच्या निवडणुकीत 19.07 कोटी रुपये खर्च केले, जे 2017 मधील 4.37 कोटी रुपयांच्या खर्चाच्या चौपट आहे.

मणिपूर आणि उत्तराखंडमधील 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा निवडणूक खर्च अनुक्रमे 23.52 कोटी रुपये (2017 मध्ये 7.86 कोटी रुपये) आणि 43.67 कोटी रुपये (2017 मध्ये 23.48 कोटी रुपये) होता. पाच राज्यांतील भाजपच्या एकूण निवडणूक खर्चापैकी मोठा हिस्सा त्यांच्या नेत्यांच्या प्रवास, जाहीर सभा, मिरवणुका आणि प्रचारावर खर्च झाला. 

भाजपने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत व्हर्च्युअल प्रचारावर जवळपास 12 कोटी रुपये खर्च केले. दुसरीकडे, काँग्रेस पक्षाच्या निवडणूक खर्चाची राज्यनिहाय माहिती उपलब्ध नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म/अ‍ॅप्स आणि इतर माध्यमातून व्हर्च्युअल मोहिमेवर 15.67 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती काँग्रेसने दिली आहे.

सर्व पक्षांना निवडणूक खर्चाची माहिती द्यावी लागतेलोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यापासून शेवटच्या तारखेपर्यंत रोख, धनादेश किंवा ड्राफ्ट किंवा वस्तू रुपात जमा केलेल्या सर्व पैशांचा हिशेब ठेवणे आवश्यक आहे. यासोबतच पक्षांना विधानसभा निवडणुकीनंतर 75 दिवसांच्या आत आणि लोकसभा निवडणुकीनंतर 90 दिवसांच्या आत आपल्या निवडणूक खर्चाची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करायची असते.

टॅग्स :BJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेस