शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
3
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
4
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
5
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
6
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
7
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
8
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
10
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
11
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
12
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
13
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
15
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
16
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
17
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
18
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
19
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
20
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

'बळकाविलेला भाग परत करा', भारताने पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 13:51 IST

काश्मीर हा पाकिस्तानसाठी गळ्याच्या शिरेइतकाच महत्त्वाचा आहे. काश्मिरी लोक करीत असलेल्या संघर्षात पाकिस्तान कायम त्यांच्यासोबत राहील, अशी विधाने करणाऱ्या मुनीर यांना भारताने गुरुवारी जोरदार फटकारले

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचा काही भाग पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतला आहे. तो पाकिस्तानने परत करणे इतकाच त्याचा काश्मीरशी संबंध आहे, अशा परखड शब्दांत भारताने त्या देशाचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना फटकारले आहे. काश्मीर हा पाकिस्तानसाठी गळ्याच्या शिरेइतकाच महत्त्वाचा आहे. काश्मिरी लोक करीत असलेल्या संघर्षात पाकिस्तान कायम त्यांच्यासोबत राहील, अशी विधाने करणाऱ्या मुनीर यांना भारताने गुरुवारी जोरदार फटकारले

इस्लामाबादमधील एका कार्यक्रमात मंगळवारी मुनीर यांनी परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना असे आवाहन केले की, आपल्या भावी पिढ्यांपर्यंत त्यांनी पाकिस्तानच्या निर्मितीची व पुढील वाटचालीची कहाणी पोहोचविली पाहिजे. हिंदू व मुस्लिम यांच्यात प्रत्येक गोष्टींत मूलभूत फरक आहे, हे आपल्या पूर्वजांनी सर्वांच्या मनावर ठसविले होते. या कार्यक्रमाला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, अन्य मंत्री उपस्थित होते. 

मुनीर यांच्या वक्तव्याला चोख प्रत्युत्तर देताना भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी सांगितले की, कोणतीही परकी गोष्ट एखाद्याच्या शरीरातील नस कशी काय असू शकते? जम्मू-काश्मीर हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. काश्मीरचा काही प्रदेश पाकिस्तानने बळकावला आहे, इतकाच त्या देशाचा त्या भागाशी संबंध आहे. बळकावलेल्या प्रदेश त्यांनी परत करायला हवा. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे व भविष्यातही हीच स्थिती राहणार आहे.  अत्याचारांबाबत माफी मागा

बांगलादेशने १५ वर्षांनंतर पाकबरोबरच्या परराष्ट्र सचिवस्तरीय चर्चेत न सुटलेले मुद्दे उपस्थित करत १९७१च्या अत्याचाराबाबत माफी मागावी, अशी मागणी केली.

‘पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू’

भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू आहे. त्याची ही प्रतिमा कधीही पुसली जाणार नाही.

मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याचे भारतात प्रत्यर्पण झाले आहे. हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांना पाक संरक्षण देत आहे.

या आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तहव्वूर राणाच्या प्रत्यर्पणामुळे पाकिस्तानला या गोष्टीची आठवण नेहमी होत राहणार आहे. 

‘पाकिस्तानचा झाला तीळपापड’

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम भारताने ५ ऑगस्ट २०१९ रोजी रद्द केले. तसेच जम्मू-काश्मीर व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केले. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अंगाचा तीळपापड झाला.

दोन्ही देशांतील संबंधात तणाव निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी मंगळवारी सांगितले की, पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धान्त मांडला होता. आपला धर्म, चालीरीती, संस्कृती, विचार वेगळे आहेत. या गोष्टी पाकिस्तानी नागरिकांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत