शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

'बळकाविलेला भाग परत करा', भारताने पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 13:51 IST

काश्मीर हा पाकिस्तानसाठी गळ्याच्या शिरेइतकाच महत्त्वाचा आहे. काश्मिरी लोक करीत असलेल्या संघर्षात पाकिस्तान कायम त्यांच्यासोबत राहील, अशी विधाने करणाऱ्या मुनीर यांना भारताने गुरुवारी जोरदार फटकारले

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचा काही भाग पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतला आहे. तो पाकिस्तानने परत करणे इतकाच त्याचा काश्मीरशी संबंध आहे, अशा परखड शब्दांत भारताने त्या देशाचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना फटकारले आहे. काश्मीर हा पाकिस्तानसाठी गळ्याच्या शिरेइतकाच महत्त्वाचा आहे. काश्मिरी लोक करीत असलेल्या संघर्षात पाकिस्तान कायम त्यांच्यासोबत राहील, अशी विधाने करणाऱ्या मुनीर यांना भारताने गुरुवारी जोरदार फटकारले

इस्लामाबादमधील एका कार्यक्रमात मंगळवारी मुनीर यांनी परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना असे आवाहन केले की, आपल्या भावी पिढ्यांपर्यंत त्यांनी पाकिस्तानच्या निर्मितीची व पुढील वाटचालीची कहाणी पोहोचविली पाहिजे. हिंदू व मुस्लिम यांच्यात प्रत्येक गोष्टींत मूलभूत फरक आहे, हे आपल्या पूर्वजांनी सर्वांच्या मनावर ठसविले होते. या कार्यक्रमाला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, अन्य मंत्री उपस्थित होते. 

मुनीर यांच्या वक्तव्याला चोख प्रत्युत्तर देताना भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी सांगितले की, कोणतीही परकी गोष्ट एखाद्याच्या शरीरातील नस कशी काय असू शकते? जम्मू-काश्मीर हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. काश्मीरचा काही प्रदेश पाकिस्तानने बळकावला आहे, इतकाच त्या देशाचा त्या भागाशी संबंध आहे. बळकावलेल्या प्रदेश त्यांनी परत करायला हवा. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे व भविष्यातही हीच स्थिती राहणार आहे.  अत्याचारांबाबत माफी मागा

बांगलादेशने १५ वर्षांनंतर पाकबरोबरच्या परराष्ट्र सचिवस्तरीय चर्चेत न सुटलेले मुद्दे उपस्थित करत १९७१च्या अत्याचाराबाबत माफी मागावी, अशी मागणी केली.

‘पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू’

भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू आहे. त्याची ही प्रतिमा कधीही पुसली जाणार नाही.

मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याचे भारतात प्रत्यर्पण झाले आहे. हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांना पाक संरक्षण देत आहे.

या आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तहव्वूर राणाच्या प्रत्यर्पणामुळे पाकिस्तानला या गोष्टीची आठवण नेहमी होत राहणार आहे. 

‘पाकिस्तानचा झाला तीळपापड’

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम भारताने ५ ऑगस्ट २०१९ रोजी रद्द केले. तसेच जम्मू-काश्मीर व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केले. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अंगाचा तीळपापड झाला.

दोन्ही देशांतील संबंधात तणाव निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी मंगळवारी सांगितले की, पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धान्त मांडला होता. आपला धर्म, चालीरीती, संस्कृती, विचार वेगळे आहेत. या गोष्टी पाकिस्तानी नागरिकांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत