शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

'बळकाविलेला भाग परत करा', भारताने पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 13:51 IST

काश्मीर हा पाकिस्तानसाठी गळ्याच्या शिरेइतकाच महत्त्वाचा आहे. काश्मिरी लोक करीत असलेल्या संघर्षात पाकिस्तान कायम त्यांच्यासोबत राहील, अशी विधाने करणाऱ्या मुनीर यांना भारताने गुरुवारी जोरदार फटकारले

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचा काही भाग पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतला आहे. तो पाकिस्तानने परत करणे इतकाच त्याचा काश्मीरशी संबंध आहे, अशा परखड शब्दांत भारताने त्या देशाचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना फटकारले आहे. काश्मीर हा पाकिस्तानसाठी गळ्याच्या शिरेइतकाच महत्त्वाचा आहे. काश्मिरी लोक करीत असलेल्या संघर्षात पाकिस्तान कायम त्यांच्यासोबत राहील, अशी विधाने करणाऱ्या मुनीर यांना भारताने गुरुवारी जोरदार फटकारले

इस्लामाबादमधील एका कार्यक्रमात मंगळवारी मुनीर यांनी परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना असे आवाहन केले की, आपल्या भावी पिढ्यांपर्यंत त्यांनी पाकिस्तानच्या निर्मितीची व पुढील वाटचालीची कहाणी पोहोचविली पाहिजे. हिंदू व मुस्लिम यांच्यात प्रत्येक गोष्टींत मूलभूत फरक आहे, हे आपल्या पूर्वजांनी सर्वांच्या मनावर ठसविले होते. या कार्यक्रमाला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, अन्य मंत्री उपस्थित होते. 

मुनीर यांच्या वक्तव्याला चोख प्रत्युत्तर देताना भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी सांगितले की, कोणतीही परकी गोष्ट एखाद्याच्या शरीरातील नस कशी काय असू शकते? जम्मू-काश्मीर हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. काश्मीरचा काही प्रदेश पाकिस्तानने बळकावला आहे, इतकाच त्या देशाचा त्या भागाशी संबंध आहे. बळकावलेल्या प्रदेश त्यांनी परत करायला हवा. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे व भविष्यातही हीच स्थिती राहणार आहे.  अत्याचारांबाबत माफी मागा

बांगलादेशने १५ वर्षांनंतर पाकबरोबरच्या परराष्ट्र सचिवस्तरीय चर्चेत न सुटलेले मुद्दे उपस्थित करत १९७१च्या अत्याचाराबाबत माफी मागावी, अशी मागणी केली.

‘पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू’

भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू आहे. त्याची ही प्रतिमा कधीही पुसली जाणार नाही.

मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याचे भारतात प्रत्यर्पण झाले आहे. हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांना पाक संरक्षण देत आहे.

या आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तहव्वूर राणाच्या प्रत्यर्पणामुळे पाकिस्तानला या गोष्टीची आठवण नेहमी होत राहणार आहे. 

‘पाकिस्तानचा झाला तीळपापड’

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम भारताने ५ ऑगस्ट २०१९ रोजी रद्द केले. तसेच जम्मू-काश्मीर व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केले. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अंगाचा तीळपापड झाला.

दोन्ही देशांतील संबंधात तणाव निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी मंगळवारी सांगितले की, पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धान्त मांडला होता. आपला धर्म, चालीरीती, संस्कृती, विचार वेगळे आहेत. या गोष्टी पाकिस्तानी नागरिकांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत