शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

महागाईच्या दराने १५ महिन्यांचा विक्रम मोडला; अन्नधान्याच्या किमतींमध्ये सर्वाधिक वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 22:00 IST

जुलै २०२३ पूर्वी किरकोळ महागाईचा दर एप्रिल २०२२मध्ये सर्वाधिक ७.७९ टक्के होता. 

नवी दिल्ली: भाज्यांच्या वाढलेल्या दरांमुळे किरकोळ महागाई दराने जुलैमधील १५ महिन्यांचा विक्रम मोडला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार किरकोळ महागाईचा दर ७.४४ टक्क्यांवर पोहोचला आहे. जून महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई ४.८७ टक्के होती. त्याच वेळी, गेल्या वर्षी जुलै महिन्यात तो ६.७१ टक्के होता. जुलै २०२३ पूर्वी किरकोळ महागाईचा दर एप्रिल २०२२मध्ये सर्वाधिक ७.७९ टक्के होता. 

जुलैमध्ये ग्राहक अन्न निर्देशांक महागाई ११.५१ टक्क्यांवर पोहोचली आहे. तर अन्न व पेय पदार्थांच्या बास्केटमधील महागाई १०.५७ टक्क्यांवर पोहोचली आहे. जूनमध्ये भाज्यांच्या किरकोळ महागाईचा दर -०.९३ टक्के होता. जुलैमध्ये ती वाढून ३७.३४ टक्के झाली. ग्रामीण भागातील महागाई ७.६३ टक्के तर शहरी महागाई ७.२० टक्के आहे. जुलै महिन्यात भाज्यांच्या महागाईचा दर ३७.३४ टक्के होता. जून २०२३मध्ये हा दर उणे ०.९३ टक्के होता. याचाच अर्थ एका महिन्यात पालेभाज्या आणि भाज्यांच्या महागाई दरात ३८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. डाळींच्या महागाईचा दर १३.२७ टक्के इतका आहे. 

किरकोळ महागाईच्या ताज्या आकडेवारीने रिझर्व्ह बँकेचा ताण वाढला आहे. सलग चार महिने नियंत्रणात राहिल्यानंतर किरकोळ महागाईने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. जुलै महिन्यात किरकोळ महागाई दराने रिझव्‍‌र्ह बँकेने ठरवून दिलेले २-६ टक्क्यांचे उद्दिष्ट ओलांडले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पतधोरण बैठकीत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नाही. महागाई दर उद्दिष्टापेक्षा जास्त गेल्यावर रिझर्व्ह बँकेवर रेपो दर वाढवण्यासाठी दबाव येऊ शकतो.

महागाई कधी कमी होणार?

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, Acuite रेटिंग्स अँड रिसर्चचे संशोधन प्रमुख सुमन कुमार चौधरी म्हणाले, भाजीपाला लागवडीचे छोटे चक्र आणि किमती कमी करण्यासाठी सरकारने काही पावले उचलल्यामुळे हा महागाईचा उच्च दर नोव्हेंबर-डिसेंबर २०२३च्या पुढे राहील असं वाटत नाही. त्यामुळे दोन ते तीन महिन्यांनंतर अन्नधान्य महागाई कमी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Inflationमहागाईvegetableभाज्याIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था