शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

एससी/एसटींच्या उपवर्गीकरणाच्या निकालाचा फेरविचार आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 03:30 IST

राज्याला असे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार देणारा कायदा पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविला होता. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 2004 मध्ये दिलेल्या निकालाचा दाखला उच्च न्यायालयाने दिला होता.

नवी दिल्ली - सरकारी नोकऱ्या, शिक्षण संस्थांमधील प्रवेशांमध्ये आरक्षणासाठी अनुसूचित जाती-जमातींचे उपवर्गीकरण करण्याचा राज्यांना अधिकार नाही या सर्वोच्च न्यायालयाने २००४ मध्ये दिलेल्या निकालाचा फेरविचार करणे आवश्यक बनले आहे, असे या न्यायालयाच्या खंडपीठाने गुरुवारी म्हटले.

न्या. अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटले आहे की, अनुसूचित जाती-जमातीच्या उपवर्गीकरणाबद्दल ई. व्ही. चिन्नया खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने निर्णय दिला होता. या निर्णयाचा आता फेरविचार होणे आवश्यक असल्याने ते प्रकरण सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासमोर सादर करण्यात येईल. ते याप्रकरणी योग्य तो आदेश देतील.

या खंडपीठात न्या. इंद्राणी बॅनर्जी, न्या. विनीत सरन, न्या. एम. आर. शहा, न्या. अनिरुद्ध बोस यांचा समावेश आहे. अनुसूचित जाती-जमातींच्या उपवर्गीकरणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या तत्कालीन खंडपीठाने १५ वर्षांपूर्वी दिलेला निकाल योग्य नाही, असे या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाचे मत आहे. अनुसूचित जाती-जमातींचे उपवर्गीकरण करून त्यांना आरक्षणात प्राधान्य देण्यासाठी राज्ये कायदे करू शकतात, असेही या खंडपीठाने म्हटले आहे.कायदा ठरविला घटनाबाह्यराज्याला असे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार देणारा कायदा पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविला होता. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 2004 मध्ये दिलेल्या निकालाचा दाखला उच्च न्यायालयाने दिला होता.

उपवर्गीकरणाबाबत पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षणासाठी उपवर्गीकरण करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे की नाही, हे ठरविण्यासाठी व2004 च्या निकालाचा फेरविचार करण्यासाठी विस्तारित खंडपीठ स्थापन करा, अशी विनंती पंजाब सरकारने सरन्यायाधीश शरद बोबडे यांना केली होती.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय