शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत केलं मोठं विधान, म्हणाले...

By बाळकृष्ण परब | Updated: October 15, 2020 17:15 IST

Mohan Bhagwat statement on reservation News : देशाला पुढे नेण्यासाठी समाजातील विषमता मिटवावी लागेल. त्यासाठी समतेचे समर्थक असलेल्या व्यक्तींना सोबत घेऊन जाताना मनातील भावामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

ठळक मुद्देआरक्षणासाठीसुद्धा कायदे झाले आहेत. मात्र त्याचा लाभ सर्वांना मिळू शकत नाही ज्यांचे जिथे वर्चस्व आहे. तेच आरक्षणाचा लाभ घेत आहेतसमाजामध्ये जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत आरक्षण लागू राहिले पाहिजे

पुणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज आरक्षणाबाबत मोठे आणि महत्त्वपूर्ण विधान केले आहे. देशाला पुढे नेण्यासाठी समाजातील विषमता मिटवावी लागेल. त्यासाठी समतेचे समर्थक असलेल्या व्यक्तींना सोबत घेऊन जाताना मनातील भावामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आरक्षणासाठीसुद्धा कायदे झाले आहेत. मात्र त्याचा लाभ सर्वांना मिळू शकत नाही आहे. ज्यांचे जिथे वर्चस्व आहे. तेच आरक्षणाचा लाभ घेत आहेत. मात्र समाजामध्ये जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत आरक्षण लागू राहिले पाहिजे. आरक्षणाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे.पुण्यात झालेल्या दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी समारंभात सामाजित समरसता या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत आपले विचार मांडताना सरसंघचालकांनी हे विधान केले. मोहन भागवत यांनी सांगितले की, सामाजिक समरसतेसाठी आपल्या आचरणामध्ये बदल घडवून आणला पाहिजे. हे आपल्याला करून दाखवावे लागेल. देश व्यापणारी विषमता उखडून टाकण्यासाठी समाजात परिवर्तन घडवून आणावे लागेल.सरसंघचालक म्हणाले की, ज्या लोकांना देशाचे तुकडे करायचे आहेत त्यांना समाजात ऐक्य प्रस्थापित होणे सहन होणार नाही. क्रांतीच्या मार्गाने समाजात समरसता आणता येणार नाही. घटनात्मक मार्गानेच समाजातील समस्यांवर तोडगा काढणे शक्य आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते.समतेशिवाय समरसता प्रस्थापित होणे शक्य नाही. त्यासाठी आपल्याला तयार राहिले पाहिजे. त्यासाठी झुकावे लागले तरी मी मागे हटणार नाही. जे वरच्या स्तरावर आहेत त्यांना झुकावे लागेल आणि जे खाली आहेत त्यांना हात पुढे करावा लागेल, तेव्हाच समाजाचा उद्धार होईल, असे सरसंघचालकांनी सांगितले.समाजात समरसता आणण्यासाठी आपल्या आचरणाचे उदाहरण लोकांसमोर ठेवावे लागेल. आधी करून नंतर दुसऱ्याला सांगावे लागेल. संघाचे स्वयंसेवक हे काम करत आहेत. सामाजिक समरसता मंचच्या लोकांनाही हे काम करावे लागेल. आपण सर्वांनी मिळून मिसळून सण, उत्सव साजरे केले पाहिजेत. आपली भाषा सुधारली पाहिजे. न्यायाच्या बाजूने उठणाऱ्या आवाजाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले.दरम्यान, संपूर्ण समाज आपला आहे हा भाव घेऊन काम केले पाहिजे. मात्र काम करायचे आहे. घटनेची प्रस्तावना सर्वांच्या आचरणात यावी यासाठी वाणीचा दिवा पेटवून समरसता लोकांच्या हृदयात उतरवली पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघreservationआरक्षणIndiaभारतPoliticsराजकारण