शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

एएन-32 अपघात: बचाव दलाची हवाई दलाकडून सुखरुप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 08:23 IST

17 दिवसांपासून अडकलेल्या बचाव दलातील सर्वजण सुखरुप

इटानगर: हवाई दलाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा शोध घेताना अडकून पडलेल्या बचाव दलातील 15 जणांची हवाई दलानं सुखरुप सुटका केली आहे. हवाई दलाच्या अधिकाऱ्यानं याबद्दलची माहिती दिली आहे. हवाई दलाच्या एएन-32 विमानाला 3 जून रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये अपघात झाला. यामध्ये विमानातील सर्व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त विमानातील कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी बचाव दल दुर्घटनास्थळी पोहोचलं होतं. मात्र या अपघातात विमानातील सर्वच जण मृत्यूमुखी पडले. त्यामुळे बचाव दलानं सर्व कर्मचाऱ्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. मात्र यानंतर बचाव दल घटनास्थळी अडकून पडलं. यामध्ये हवाई दलाच्या 8, लष्कराच्या 4 कर्मचाऱ्यांचा आणि 3 सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता. या सर्वांची शनिवारी एएलएच आणि एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं सुखरुप सुटका करण्यात आली. शिलाँगमधील हवाई दलाचे प्रवक्ते विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी ही माहिती दिली. बचाव पथकातील सर्वांची सुटका करण्यास आली असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं सिंह यांनी सांगितलं. 'वातावरण खराब असल्यानं बचाव पथकाला दुर्घटना स्थळावरुन निघण्यास उशीर झाला. शनिवारी वातावरणात थोडी सुधारणा झाली. मात्र तरीही धोका कायम होता. यानंतर बचाव दलाच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आली,' अशी माहिती सिंह यांनी दिली. अपघातग्रस्त विमानातील हवाई दलाच्या 13 कर्मचाऱ्यांचे मृतदेह आणि विमानातील ब्लॅक बॉक्स आणण्यासाठी बचाव दल घटनास्थळी पोहोचलं होतं. सियांग जिल्ह्यातील डोंगराळ भागातून मृतदेह बाहेर काढण्याचं काम 20 जूनला पूर्ण झालं. आसामच्या जोरहाटमधून 3 जूनला एएन 32 विमानानं उड्डाण केलं होतं. मात्र उड्डाणानंतर अवघ्या 33 मिनिटांमध्येच हे विमान बेपत्ता झालं.  

टॅग्स :Accidentअपघातindian air forceभारतीय हवाई दल