शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

एएन-32 अपघात: बचाव दलाची हवाई दलाकडून सुखरुप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 08:23 IST

17 दिवसांपासून अडकलेल्या बचाव दलातील सर्वजण सुखरुप

इटानगर: हवाई दलाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा शोध घेताना अडकून पडलेल्या बचाव दलातील 15 जणांची हवाई दलानं सुखरुप सुटका केली आहे. हवाई दलाच्या अधिकाऱ्यानं याबद्दलची माहिती दिली आहे. हवाई दलाच्या एएन-32 विमानाला 3 जून रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये अपघात झाला. यामध्ये विमानातील सर्व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त विमानातील कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी बचाव दल दुर्घटनास्थळी पोहोचलं होतं. मात्र या अपघातात विमानातील सर्वच जण मृत्यूमुखी पडले. त्यामुळे बचाव दलानं सर्व कर्मचाऱ्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. मात्र यानंतर बचाव दल घटनास्थळी अडकून पडलं. यामध्ये हवाई दलाच्या 8, लष्कराच्या 4 कर्मचाऱ्यांचा आणि 3 सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता. या सर्वांची शनिवारी एएलएच आणि एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं सुखरुप सुटका करण्यात आली. शिलाँगमधील हवाई दलाचे प्रवक्ते विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी ही माहिती दिली. बचाव पथकातील सर्वांची सुटका करण्यास आली असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं सिंह यांनी सांगितलं. 'वातावरण खराब असल्यानं बचाव पथकाला दुर्घटना स्थळावरुन निघण्यास उशीर झाला. शनिवारी वातावरणात थोडी सुधारणा झाली. मात्र तरीही धोका कायम होता. यानंतर बचाव दलाच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आली,' अशी माहिती सिंह यांनी दिली. अपघातग्रस्त विमानातील हवाई दलाच्या 13 कर्मचाऱ्यांचे मृतदेह आणि विमानातील ब्लॅक बॉक्स आणण्यासाठी बचाव दल घटनास्थळी पोहोचलं होतं. सियांग जिल्ह्यातील डोंगराळ भागातून मृतदेह बाहेर काढण्याचं काम 20 जूनला पूर्ण झालं. आसामच्या जोरहाटमधून 3 जूनला एएन 32 विमानानं उड्डाण केलं होतं. मात्र उड्डाणानंतर अवघ्या 33 मिनिटांमध्येच हे विमान बेपत्ता झालं.  

टॅग्स :Accidentअपघातindian air forceभारतीय हवाई दल