शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सज्ज; राष्ट्रपती रामनाथ कोविंद

By देवेश फडके | Updated: January 25, 2021 20:12 IST

शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सज्ज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना ते बोलत होते.

ठळक मुद्देप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशाला संबोधनशेतकरी, शास्त्रज्ञ, भारतीय सैन्य या मुद्यांवर भाष्यकोरोना संकटासंदर्भात व्यक्त केले मत

नवी दिल्ली : शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सज्ज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देश कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात शेतकरी आंदोलन, कोरोना संकट, भारत-चीन सीमावाद यांसारख्या मुद्द्यांवर भाष्य केले. 

कोरोना संकटाशी लढताना आपले प्राण गमावलेल्यांबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. कोरोना संकटाची तीव्रता माहिती असूनही देशसेवेसाठी लढणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांच्या कार्याचा उल्लेख राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात केला. 

कोरोना संकटात अनेकांनी आपले प्राण गमावले. कोरोना संकटाशी लढताना मानवतेचे आदर्श उदाहरण अनेकांनी समोर ठेवली. भारतीय तत्त्वज्ञानातील बंधुत्वाच्या व्यापक विचारामुळे कोरोना संकटाशी लढा देणे शक्य झाले, असेही राष्ट्रपती यांनी नमूद केले.

शास्त्रज्ञांचे कौतुक आणि अभिनंदन

कोरोना काळात शास्त्रज्ञांनी दिवस-रात्र काम करून कोरोना लस देशवासीयांसाठी उपलब्ध करून दिली. देशभरातील शास्त्रज्ञांचे कौतुक करावे, तेवढे थोडे आहे. संपूर्ण देशवासीयांच्या वतीने सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो. अत्यंत कमी कालावधीत कोरोनासारख्या महाभयंकर आजारावर त्यांनी लस निर्मिती करून मानवतेचे कल्याण करण्यासाठी महत्त्वाचे कार्य करून इतिहास घडवला आहे. सर्व शास्त्रज्ञांचा देशाला अभिमान आहे, असेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले. 

भारतीय सैन्याचा देशाला गर्व

भारतीय सैनिकांचे देशप्रेम, बलिदान आणि पराक्रम यावर देशाला गर्व आहे. सियाचीन आणि गलवान खोऱ्यात उणे ५० ते ६० अंश तापमानातही भारतीय जवानांनी सीमांचे संरक्षण केले. एवढेच नव्हे, तर राजस्थानातील जैसलमेर ५० अंश तापमान असूनही भारतीय जवान कधीही मागे हटले नाहीत. कोणत्याही परिस्थितीत देशाचे संरक्षण करण्यास तसेच शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सज्ज आहे, असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध

नैसर्गिक आव्हानांचा सामना करत देशातील अन्नदात्या शेतकऱ्यांनी पीकांचे उत्पादन करण्यात कमतरता येऊ दिली नाही. देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. न्याय, स्वतंत्रता, समता आणि बंधुता आपल्या जीवनातील शाश्वत सिद्धांत आहेत. या मार्गावर मार्गक्रमण करत सर्वांचे जीवन समृद्ध करण्याची आपली शिकवण आहे. नव्या पीढीवर काळानुरूप या सिद्धांताची सार्थकता स्थापन करण्याची जबाबदारी आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले. 

महात्मा गांधींचे विचार अमलात आणणे गरजेचे

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार अमलात आणणे गरजेचे असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी केला. महात्मा गांधींचे जीवन आणि विचार यांचे चिंतन करणे आपल्या दिनचर्येचा एक भाग असायला हवा. समाजातील कोणतीही व्यक्ती दुःखी, कष्टी राहता कामा नये, यावर भर द्यायला हवा, असेही राष्ट्रपती म्हणाले.

इतिहासातील नायकांचे स्मरण

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय, महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस या जननायकांच्या विचारांमुळे आपल्या स्वातंत्र्य संग्रामाला कायम प्रेरणा दिली. मातृभूमिच्या सोनेरी भविष्यासाठी या प्रत्येकाच्या संकल्पना, विचार वेगळे होते. मात्र, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांनी त्यांचे स्वप्न एकाच सूत्रात बांधण्याचे काम केले, असेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले. 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनPresidentराष्ट्राध्यक्षRamnath Kovindरामनाथ कोविंदIndiaभारतFarmerशेतकरीIndian Armyभारतीय जवान