शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

प्रजासत्ताक दिन; राष्ट्रपतींच्या बग्गीबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 15:58 IST

भारतामध्ये उद्या 26 जानेवारी रोजी 69 वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केला जाईल. या दिवशी राजधानी नवी दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य सोहळ्याचे आणि संचलनाचे सर्वांनाच आकर्षण असते. या दिवशी वापरल्या जाणाऱ्या राष्ट्रपतींच्या बग्गीचा इतिहासही अत्यंत रोचक आहे.

नवी दिल्ली- भारतामध्ये उद्या 26 जानेवारी रोजी 69 वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केला जाईल. या दिवशी राजधानी नवी दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य सोहळ्याचे आणि संचलनाचे सर्वांनाच आकर्षण असते. राष्ट्रपती या कार्यक्रमासाठी विशेष बग्गीमधून येऊन सहभागी होतात. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती या पदावरुन प्रथमच या सोहळ्यासाठी उपस्थित राहाणार आहेत. राष्ट्रपतींच्या बग्गीचा इतिहासही अत्यंत रोचक आहे.

राष्ट्रपती सध्या वापरत असलेली बग्गी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये व्हॉइसरॉय किंवा गव्हर्नर जनरलकडून वापरली जायची. भारत स्वतंत्र झाल्यानंतर फाळणीच्यावेळेस अनेक वस्तू, वास्तूंचीही वाटणी करण्यात आली. गव्हर्नर जनरलच्या सुरक्षारक्षकांची भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 2:1 अशा प्रमाणात विभागणी करण्यात आली. आज त्याला प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड असे म्हटले जाते. 

 गव्हर्नर जनरलच्या बग्गीवर दोन्ही देशांनी हक्क सांगितल्यावर तिच्या विभागणीचा प्रश्न उभा राहिला. शेवटी नाणेफेक करुन तिची विभागणी करण्यात आली. गव्हर्नर जनरलच्या सुरक्षादलाच्या कमांडंटनी हा नाणेफेक करुन निर्णय दिला. राष्ट्रपतींच्या या बग्गीला भारतीय आणि ऑस्ट्रेलियन जातीच्या मिश्र संकराचे घोडे वापरले जातात. 1950 साली झालेल्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात या बग्गीला 6 ऑस्ट्रेलियन घोडे जुंपण्यात आले होते. 1984 पर्यंत या बग्गीचा उपयोग राष्ट्रपती करत होते. त्यानंतर तिचा वापर थांबवण्यात आला होता. मात्र माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या काळात तिचा पुन्हा वापर सुरु करण्यात आला.

पहिला प्रजासत्ताक सोहळा-२६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी गव्हर्नमेंट हाउसच्या दरबार हाउसमध्ये पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. देशातील पहिली परेड इंडिया गेट आणि राजपथ यांच्यामध्ये न होता, त्याच्या जवळ असलेल्या निर्वान स्टेडियममध्ये निघाली. त्याला आज ‘मे. ध्यानचंद स्टेडियम’ म्हणून ओळखले जाते. त्यादिवशी ध्वजाला ३१ तोफांची सलामी दिली गेली होती, त्यानंतर ध्वज फडकवण्यात आला. पहिला समारोह दुपारनंतर साजरा करण्यात आला. या वेळेस पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद ६ घोड्यांच्या बग्गीतून गव्हर्नमेंट हाउसमधून दुपारी २.३० वाजता निघाले. कॅनॉट प्लेस व ल्यूटेन्स झोन याला फेरी मारत, त्यांची फेरी स्टेडियमच्या आत पोहोचली व ३.४५ वाजता सलामी मंचापर्यंत पोहोचली, तेव्हा तिरंग्याला ३१ तोफांची सलामी देण्यात आली.

टॅग्स :Republic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८Presidentराष्ट्राध्यक्षRamnath Kovindरामनाथ कोविंदNew Delhiनवी दिल्ली