शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोठी दुर्घटना; विजेचा शॉक लागून 3 विद्यार्थी जखमी, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 16:09 IST

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान एका सरकारी शाळेत भीषण दुर्घटना झाली आहे.

नवी दिल्ली - देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. बिहारच्या बक्सरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान एका सरकारी शाळेत भीषण दुर्घटना झाली आहे. विजेच्या तारेचा झटका लागून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर तीन मुलं जखमी आहेत. बक्सर जिल्ह्यातील इटढी भागातील नाथपूर प्राथमिक शाळेत हा अपघात झाला. ध्वजारोहण सुरू असताना लोखंडी पाईप विजेच्या तारेवर पडल्याने ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे तिथे उभ्या असलेल्या चार मुलांना विजेच्या झटका लागला. यावेळी एकच आरडाओरडा झाला. 

जखमी झालेल्या मुलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान एका मुलाचा मृत्यू झाला. तर तीन मुलांवर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी नाथपूर प्राथमिक शाळेत लोखंडी पाईप उभारण्यात आला होता. प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी येथील शाळेत मोठ्या संख्येने मुले पोहोचली होती. 

ध्वजारोहण सुरू असताना अचानक बाजूने जाणाऱ्या 11 हजार व्होल्टच्या हाय टेंशन वायरवर पाईप पडला. त्यानंतर त्यात करंट आला. चार मुले त्या पाईपच्या संपर्कात आली आणि करंट बसला. शुभम कुमार, परमेश्वरा, कृष्णा आणि इंद्रजित अशी या मुलांची नावे आहेत. जखमी झालेल्या मुलांना रुग्णालयात आणण्यात आले आहे. पाचवीत शिकणाऱ्या शुभम कुमार या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर गावकरी संतप्त झाले असून त्यांनी रास्ता रोको केला आहे. यानंतर पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहे. 

गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेनंतर राजपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार विश्वनाथ राम रुग्णालयात पोहोचले. त्यांनी जखमी मुलांच्या प्रकृतीची कुटुंबीयांकडून माहिती घेतली. वीज पुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप काँग्रेस आमदार विश्वनाथ राम यांनी केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनSchoolशाळाStudentविद्यार्थीBiharबिहार