शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

प्रदेशाध्यक्षांकडून मागविला अहवाल; काँग्रेस जाणून घेणार पराभवाची कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 04:00 IST

प्रत्येक लोकसभा मतदार संघात प्रत्येक बूथवर झालेल्या मतदानाचे संपूर्ण तपशील तयार करून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला किती मते मिळाली आणि जर तो मागे पडला असेल तर त्याची कारणे कोणती हे कळवावे

शीलेश शर्मा नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाचा अभ्यास पक्षाने सुरू केला आहे. उच्चपदस्थ सूत्रांनुसार पक्षाने सगळ्या प्रदेश अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात पराभवाच्या कारणांचा सविस्तर अहवाल पाठवण्यास सांगितले आहे.‘लोकमत’ कडे हे पत्र असून त्यात म्हटले आहे की, प्रत्येक लोकसभा मतदार संघात प्रत्येक बूथवर झालेल्या मतदानाचे संपूर्ण तपशील तयार करून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला किती मते मिळाली आणि जर तो मागे पडला असेल तर त्याची कारणे कोणती हे कळवावे. सूत्रांचा दावा आहे की पक्षाचे नेतृत्व लोकसभा निवडणुकीत अंतर्गत कलहामुळे पक्षाचे किती नुकसान झाले आणि कलह दूर करण्यासाठी काय उपाय करावेत हे पडताळून बघत आहे. परंतु, ही सर्व उपाययोजना सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीला पूर्णविराम मिळाल्यानंतरच पूर्ण होईल.

११ जूननंतर कार्यकारिणी समितीची बैठकराज्यांच्या प्रदेश अध्यक्षांना पाठवलेल्या या पत्रात ११ जूनपर्यंत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. ११ जूननंतर पक्षाच्या कार्यकारिणी समितीची बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे. तीत प्रत्येक राज्याच्या प्रभारी महासचिवाकडून प्रदेश अध्यक्षांकडून मिळालेल्या अहवालावर टिप्पणी मागितली जाईल. त्यातून हे समजून घेता येईल की, पक्षाचा लोकसभा निवडणुकीत एवढा दारूण पराभव का झाला.

टॅग्स :congressकाँग्रेस