शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

भारतामध्ये फाशीची शिक्षा ठोठावण्याचे प्रमाण घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 12:30 PM

भारतामध्ये एकूण 317 लोकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.

नवी दिल्ली- भारतीय न्यायालयांकडून फाशीची शिक्षा सुनावण्यामध्ये घट होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. 2017 साली त्याआधीच्या वर्षापेक्षा फाशीच्या शिक्षा ठोठावण्यात 20 टक्के घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी भारतातील न्यायालयांनी 109 जणांना फाशीची शिक्षा ठोठावली मात्र त्यातील कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष फाशी देण्यात आलेली माही असे अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने प्रसिद्ध केलेल्या माहितीत म्हटले आहे.2016 साली 136 जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती तर 2017 साली त्यात 27 ने घट झाल्याचे अॅम्नेस्टीच्या "डेथ सेनटेन्स अँड एक्झीक्युशन्स 2017" या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अॅम्नेस्टीचा हा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. गेल्यावर्षी झालेल्या फाशीच्या शिक्षांमध्ये 51 जणांना हत्या केल्याबद्दल मृत्युदंड ठोठावला गेला तर 2016 साली 87 जणांना हत्येच्या गुन्ह्यात फाशी ठोठावली गेली होती असे अॅम्नेस्टीने लंडनस्थित नॅशनल लॉ युनिवर्सिटीच्या सेंटर ऑन डेथ पेनल्टी विभागाच्या आकडेवारीच्या मदतीने स्पष्ट केले आहे.भारतामध्ये एकूण 317 लोकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. 2015 साली भारतातील आजवरची शेवटची फाशी देण्यात आली होती. याकूब मेमन याला ही फाशी देण्यात आली होती. 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता. त्या गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. ही सर्व माहिती अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे वरिष्ठ संचालक तावांडा मुत्साह यांनी दिली. फाशीची शिक्षा ठोठावण्यात चीनचा नंबर सर्वात वरती असून 2018 साली फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली संख्या हजाराच्या वर आहे. मात्र नक्की संख्या स्पष्ट झालेली नाही. त्यानंतर इराणचा नंबर लागतो. इराणमध्ये 507 जणांना फाशी सुनावली गेली. सौदी अरेबियामध्ये 146, इराकमध्ये 125 तर पाकिस्तानात 60 जणांना फाशीची सुनावण्यात आलेली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयDeathमृत्यू