शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

भारतामध्ये फाशीची शिक्षा ठोठावण्याचे प्रमाण घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 12:30 IST

भारतामध्ये एकूण 317 लोकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.

नवी दिल्ली- भारतीय न्यायालयांकडून फाशीची शिक्षा सुनावण्यामध्ये घट होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. 2017 साली त्याआधीच्या वर्षापेक्षा फाशीच्या शिक्षा ठोठावण्यात 20 टक्के घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी भारतातील न्यायालयांनी 109 जणांना फाशीची शिक्षा ठोठावली मात्र त्यातील कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष फाशी देण्यात आलेली माही असे अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने प्रसिद्ध केलेल्या माहितीत म्हटले आहे.2016 साली 136 जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती तर 2017 साली त्यात 27 ने घट झाल्याचे अॅम्नेस्टीच्या "डेथ सेनटेन्स अँड एक्झीक्युशन्स 2017" या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अॅम्नेस्टीचा हा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. गेल्यावर्षी झालेल्या फाशीच्या शिक्षांमध्ये 51 जणांना हत्या केल्याबद्दल मृत्युदंड ठोठावला गेला तर 2016 साली 87 जणांना हत्येच्या गुन्ह्यात फाशी ठोठावली गेली होती असे अॅम्नेस्टीने लंडनस्थित नॅशनल लॉ युनिवर्सिटीच्या सेंटर ऑन डेथ पेनल्टी विभागाच्या आकडेवारीच्या मदतीने स्पष्ट केले आहे.भारतामध्ये एकूण 317 लोकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. 2015 साली भारतातील आजवरची शेवटची फाशी देण्यात आली होती. याकूब मेमन याला ही फाशी देण्यात आली होती. 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता. त्या गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. ही सर्व माहिती अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे वरिष्ठ संचालक तावांडा मुत्साह यांनी दिली. फाशीची शिक्षा ठोठावण्यात चीनचा नंबर सर्वात वरती असून 2018 साली फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली संख्या हजाराच्या वर आहे. मात्र नक्की संख्या स्पष्ट झालेली नाही. त्यानंतर इराणचा नंबर लागतो. इराणमध्ये 507 जणांना फाशी सुनावली गेली. सौदी अरेबियामध्ये 146, इराकमध्ये 125 तर पाकिस्तानात 60 जणांना फाशीची सुनावण्यात आलेली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयDeathमृत्यू