शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

प्रसारमाध्यमांशी बोलाल तर याद राखा ! एअर इंडियाची कर्मचाऱ्यांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 14:21 IST

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी विमानात चित्रफिती सोशल मिडीयावर टाकणे, तसेच कंपनीविरोधात बोलणे आदी प्रकार केले होते.

नवी दिल्ली : आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या एकमेव भारतीय विमान कंपनी एअर इंडियाने कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे. प्रसारमाध्यमे, सोशल मिडीय़ावर आपल्या प्रतिक्रिया द्याल तर याद राखा, मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या लेखी परवानगीशिवाय बोलल्यास कारवाईची धमकी दिली आहे. 

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी विमानात चित्रफिती सोशल मिडीयावर टाकणे, तसेच कंपनीविरोधात बोलणे आदी प्रकार केले होते. याविरोधात कर्मचाऱ्यांना 30 एप्रिलला हा इशारा देण्यात आल्याचे एका वृत्त एजन्सीने म्हटले आहे. 

या आदेशामध्ये कंपनीचा कोणताही कर्मचारी मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या लेखी परवानगीशिवाय खासगीरित्या, कंपनीविरोधात किंवा कामगार संघटनेच्या नावावर बोलू शकणार नाही. तसेच ना ही कंपनीच्या संबंधित कोणताही व्हिडीओ पोस्ट करेल. या आदेशाचे उल्लंघन केल्यास गंभीर दखल घेतली जाईल आणि नियमांनुसार कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.

एअर इंडियाच्या कामगार संघटनांनी नुकसानीत चाललेल्या एअरलाईनच्या खासगीकरणाच्या प्रयत्नांवर सार्वजनिकरित्या विरोध दर्शविला होता. सरकारने गेल्यावर्षी एअर इंडियामधील हिस्सा विकण्य़ाचा प्रयत्न केला होता, मात्र कोणीही खरेदीदार पुढे आला नव्हता.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाEmployeeकर्मचारी