शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

... तर महाराष्ट्रासह सात राज्यातील जिओ ग्राहकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 13:51 IST

रिलायन्स जिओ इन्फोकॉमने जर रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून स्पेक्ट्रम खरेदी केली नाही तर दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह सात राज्यांतील जिओच्या ग्राहकांना फटका बसू शकतो.

ठळक मुद्दे रिलायन्स जिओ इन्फोकॉमने जर रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून स्पेक्ट्रम खरेदी केली नाही तर दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह सात राज्यांतील जिओच्या ग्राहकांना फटका बसू शकतो.जिओची सेवा मिळविण्यासाठी या ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतोआंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूसह काही राज्यात 800 मेगाहर्ट्ज बँड पाच युनिट्सवर अवलंबून आहे.

कोलकाता - रिलायन्स जिओ इन्फोकॉमने जर रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून स्पेक्ट्रम खरेदी केली नाही तर दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह सात राज्यांतील जिओच्या ग्राहकांना फटका बसू शकतो. जिओची सेवा मिळविण्यासाठी या ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती टेलिकॉम सेक्टरमधील तज्ज्ञांनी वर्तवली आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूसह काही राज्यात 800 मेगाहर्ट्ज बँड पाच युनिट्सवर अवलंबून आहे. स्पेक्ट्रम ब्लॉकसाठी जिओ आरकॉमवर अवलंबून आहे. हा बँड 4 जी एलटीई सेवेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. यातून प्रत्येक सर्कलमध्ये जिओकडे 800 मेगाहर्ट्झ बँडमध्ये 4जी एअरवेव्सच्या 3.8 युनिट्स आहेत. या बँडमध्ये एलटीई कव्हरेजसाठी आरकॉमच्या स्पेक्ट्रमवर अवलंबून आहे.

रोहन धमीजा यांनी दिलेल्या माहितीनुसार,  स्पेक्ट्रम ट्रेडिंग डील लवकर स्पष्ट होणे जिओसाठी अत्यंत गरजेचे आहे. कारण या डीलनंतर जिओला आरकॉम 4जी स्पेक्ट्रम मिळेल. ही डील झाल्यास जिओला 800 मेगाहर्ट्ज बँडमध्ये कंटिगुअस ब्लॉक्स बनवण्यासाठी मदत मिळेल.  2017 मध्ये स्पेक्ट्रम ट्रेडिंग करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. या कराराला मंजुरी मिळाल्यानंतर आरकॉम 4जी एअरवेव्सची 112.4 युनिट्स जिओला विकण्यात आली होती. यातून 800 मेगाहर्ट्ज बँड एलटीई स्पेक्ट्रमचाही समावेश होता. 

आरकॉनने सिस्टेमा श्याम टेलिसर्विसेसजकडून खरेदी केली होती. आरकॉमवर 46,000 कोटींचे कर्ज आहे. हा स्पेक्ट्रम विकल्यानंतर आरकॉमला 18,000 कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी मदत होईल. आरकॉम आणि जिओ या दोन्हींसाठी ही डील अत्यंत महत्त्वाची आहे. जर हा स्पेक्ट्रम मिळाला नाही तर मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, ओडिशा, आसामसह पूर्वीकडील राज्यातील जिओ ग्राहकांच्या सेवेला फटका बसण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओJioजिओ