शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

सफाई कामगार भरतीस आयुक्तांचा नकार महापालिका : संघटनेला दिला न्यायालयात जाण्याचा सल्ला

By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST

नाशिक : महापालिकेत सफाई कामगार भरतीस महापालिका आयुक्तांनी स्वच्छ शब्दात नकार दिला आहे. भरती करू नका, हे शासनाचेच धोरण असल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी भरतीसाठी आंदोलने करणार्‍या कामगारांना न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.

नाशिक : महापालिकेत सफाई कामगार भरतीस महापालिका आयुक्तांनी स्वच्छ शब्दात नकार दिला आहे. भरती करू नका, हे शासनाचेच धोरण असल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी भरतीसाठी आंदोलने करणार्‍या कामगारांना न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.
महापालिकेत कुंभमेळ्याची पूर्वतयारी सुरू आहे. कुंभमेळ्यात नोकर भरती करावी, यासाठी विविध संघटनांकडून प्रयत्न सुरू होते. दोन दिवसांपूर्वी सफाई कामगारांची भरती करावी, तसेच स्वच्छतेच्या कामाचे आऊटसोर्सिंगचे काम करण्यास विरोध करताना हे काम सफाई कामगारांकडून करून घ्यावे, अशा आशयाची मागणी करीत आंदोलन केले होते. परंतु आयुक्त डॉ. प्रवीणकुमार गेडाम यांनी या शिष्टमंडळाला नकार दिला. शनिवारी पत्रकारांशी बोलताना डॉ. गेडाम यांनी सांगितले की, महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे भरती न करता आऊटसोर्सिंग करून कामे करून घ्यावीत, हे शासनाचेच धोरण आहे. त्यातच महापालिकेला कुंभमेळ्याच्या कालावधीत कधी काही कामगार नऊ दिवस, तर काही ९० दिवस कर्मचार्‍यांची गरज आहे. इतक्या अल्पकाळासाठी कामगारांची भरती करून अन्य वेळी काय करणार, असा प्रश्न त्यांनी केला. त्याचप्रमाणे आऊटसोर्सिंग करताना संबंधित ठेकेदारावर स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी टाकण्यात येणार असून, ठेकेदाराला जबाबदार धरून कारवाई करता येईल, असेही त्यांनी सांगितले. आंदोलन करणार्‍या कर्मचारी संघटनेला आपण नकार दिल्यानंतर त्यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. तथापि, कर्मचारी भरती होऊच शकत नसल्याने न्यायालयात जाऊ शकता, असेही सांगितल्याचे गेडाम म्हणाले.
महापालिकेतील अन्य रिक्त पदे केवळ आस्थापना खर्च मर्यादेपेक्षा अधिक असल्याने भरता येणार नाही, आवश्यक पदे तरी वेळेत भरता यावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून त्यानुसार पाठपुरावा सुरू असल्याचेही ते म्हणाले.
..इन्फो...
अतिरिक्त आयुक्तपदासाठी सारेच अपात्र
महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे मंजूर आहेत. शासनाने एका अधिकार्‍याची प्रतिनियुुक्तीवर झाली आहे, तर दुसर्‍या रिक्त पदासाठी पालिकेत सध्या तरी पात्रता धारण करणारे अधिकारी नसल्यामुळे तूर्तास प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठविण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात येत आहे. नवीन अधिकार्‍याचा कार्यकाल पूर्ण होईपर्यंत अनेक अधिकारी पात्रतेच्या अटी पूर्ण करू शकतील, असेही त्यांनी सांगितले.