तोतलाडोह वनक्षेत्रातील कॉलनीचे पुनर्वसन
By Admin | Updated: December 19, 2014 22:56 IST2014-12-19T22:56:55+5:302014-12-19T22:56:55+5:30
नागपूर : तोतलाडोह (पेंच राष्ट्रीय उद्यान ) वनक्षेत्रातील पाटबंधारे विभागाच्या कॉलनीचे दोन वर्षांत पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती शुक्रवारी हायकोर्टात सादर करण्यात आली.

तोतलाडोह वनक्षेत्रातील कॉलनीचे पुनर्वसन
न गपूर : तोतलाडोह (पेंच राष्ट्रीय उद्यान ) वनक्षेत्रातील पाटबंधारे विभागाच्या कॉलनीचे दोन वर्षांत पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती शुक्रवारी हायकोर्टात सादर करण्यात आली.नेचर कन्झर्व्हेशन सोसायटीने तोतलाडोह येथील वनसंरक्षण, प्रतिबंधित क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन इत्यादी मुद्यांकडे लक्ष वेधणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. याप्रकरणात पाटबंधारे विभागाचे नागपूर येथील अधीक्षक अभियंता व प्रशासक आर. के. धावडे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. प्रतिज्ञापत्रानुसार, तोतलाडोह येथील १५ हेक्टर जमीन पाटबंधारे विभाग व मध्य प्रदेश वीज मंडळाच्या ताब्यात होती. यापैकी १२ हेक्टर जमीन वन विभागाला हस्तांतरित करण्यात आली आहे. उर्वरित जमिनीवर दोन्ही विभागाचा ताबा आहे. शासनाने पाटबंधारे विभागाला रहिवासी कॉलनीच्या पुनर्वसनासाठी पवनी येथील जमीन दिली आहे. येथे दोन वर्षांत नवीन कॉलनी तयार करण्यात येणार आहे. याचिकाकर्त्यातर्फे वरिष्ठ वकील सी. एस. कप्तान व ॲड. पृथ्वीराज चव्हाण यांनी कामकाज पाहिले.