नियमानुसार पुनर्वसन करा
By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:29+5:302014-12-28T23:40:29+5:30
फोटो - रॅप

नियमानुसार पुनर्वसन करा
फ टो - रॅप विक्तुबाबा नगरवासीयांची मागणी : नगरवासी १५ दिवसांपासून धरण्यावरनागपूर : मिहान प्रकल्पांतर्गत जमिनीचे संपादन करतांना सर्वांना समान न्याय द्या, पुनर्वसनाच्या नियमानुसार मोबदला द्यावा, या मागणीसाठी विक्तुबाबा नगरातील मिहान प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीचे अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे. विक्तुबाबा नगरवासीयांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात केवळ १००० चौरस फूट जमीन एवढाच मोबदला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गेल्या ४० वर्षापासून विक्तुबाबानगर वसलेले आहे. येथे २१० घर असून, हजारावर लोकसंख्या आहे. या नगराचा मिहान प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने त्यांच्या घराच्या मोबदल्यात केवळ १००० चौरस फूट विकसित जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा हा निर्णय येथील रहिवाशांना मान्य नाही. आम्हाला १५०० चौरस फूट जागा द्यावी, १० लाख रुपये मोबदला द्यावा, एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी येथील नगरवासीयांची आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेऊन, आपल्या मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या आहे. जोपर्यंत पुनर्वसनाच्या नियमानुसार मोबदला मिळत नाही, तोपर्यंत जमिनी संपादित होऊ देणार नाही, असा इशारा समितीने दिला आहे. ::::चौकट:::समाधानकारक पुनर्वसन व्हावेसरकार आमच्या जमिनी घेऊन त्याचा व्यावसायिक उपयोग करीत आहे. त्यामुळे आमचे पुनर्वसन नियमानुसार होणे गरजेचे आहे. सरकार ही जमीन अतिक्रमण असल्याचे सांगत आहे. मात्र हे नगर ४० वर्षापासून वसलेले आहे. त्याचा पुरावा आमच्याकडे आहे. सरकारने पुनर्वसन कायद्यांतर्गत याला स्लम घोषित करून, त्याअंतर्गत मिळणारा लाभ द्यावा. नटराज पिल्ले, सचिव, मिहान प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समिती