शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

राजीनाम्याचं ‘घी’ की राजेंचा ‘बडगा’?

By admin | Updated: January 29, 2016 23:48 IST

आज ‘आर या पार’ : जिल्हा परिषद उपाध्यक्ष साळुंखेंबाबत जिल्हा बँकेच्या सभेनंतर निर्णय होण्याची शक्यता

सातारा : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्या राजीनाम्याबाबत शनिवारी ‘आर या पार’चा निर्णय होणार आहे. जिल्हा बँकेच्या मासिक सभेनंतर ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होणार असली तरी खासदार उदयनराजे भोसले यांनी राजीनाम्यासाठी घायकुतीला आलेल्या नेत्यांना ‘घी देखा है लेकिन बडगा नही देखा,’ या भाषेत शुक्रवारी सुनावले आहे. जिल्हा परिषदेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीकडे आपला राजीनामा सादर केला; पण उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय झाला नव्हता. या पेचप्रसंगात अडकून न राहता साळुंखे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये जोरदार खलबत्ते सुरू झाली.दुसऱ्या बाजूला आमदार शशिकांत शिंदे यांनीही खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी याबाबत बोलणी केली. उदयनराजेंच्या आदेशाशिवाय राजीनामा देणार नसल्याचे साळुंखे यांनी स्पष्ट केले होते. राष्ट्रवादीने त्यांना ३१ जानेवारीची मुदत दिली होती. त्यापूर्वी राजीनामा न दिल्यास पुढील कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. खासगी कामानिमित्त बाहेरगावी असल्याने साताऱ्यात येऊ न शकलेल्या उदयनराजेंशी आ. शशिकांत शिंदे यांनी पुढाकार घेऊन याबाबत बोलणी केली. त्यामुळे शनिवारी खासदार उदयनराजे यांनी सूचना केल्या तर उपाध्यक्षांचा राजीनामा पक्षाकडे सादर होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. साहजिकच, उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचालींना तूर्तास अल्पविराम मिळाला आहे. दरम्यान, या हालचाली सुरू असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी एक पत्रक प्रसिद्धीला दिले. या पत्रकामध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याच्या वावड्या उठविल्या जात आहेत. किमान पवारांचा अपमान होईल अशा वावड्या उठवू नयेत. रवी साळुंखे यांना खुर्चीवर बसविताना अंतिम चर्चा पवारांशी केली होती. गल्लीपेक्षा दिल्लीत आम्ही नेहमीच एकत्र येत असतो. मध्यंतरी त्यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना आम्ही गल्लीतील गोष्टी सांगितल्या नाहीत ; परंतु सूतोवाच केले होते. त्यावेळी दिल्लीत चर्चा करु, असे पवारांनी सांगितले होते. ते सांगतील त्यानुसारच आम्ही जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेणार होतो, अशी माहिती या प्रसिद्धी पत्रकात उदयनराजेंनी दिली आहे. (प्रतिनिधी)उपाध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत अधिवेशन काळात शरद पवार यांच्याशी बोलून निर्णय घेणार होतो; मात्र काहीजण त्याआधीच ‘घायकुती’ला आले आहेत. कोणत्याही पदाला काही कालावधी हा समजून उमजून घेण्याकरिता जात असतो, त्यामुळे विद्यमान पदाधिकारी बदलाची टूम कोणी आणि का काढली, हे समजून येत नाही.- उदयनराजे भोसले, खासदारउपाध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीत शरद पवारांशी चर्चा करण्यात येणार असल्याचा ‘सांगावा’ एका व्यक्तीजवळ धाडला होता; पण संबंधिताने तो पोहोचविलाच नाही, असे उदयनराजेंनी पत्रकात म्हटले आहे. आता हा ‘सांगावा’ आणणारी व्यक्ती कोण?, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाने ३१ जानेवारीपर्यंत राजीनामे सादर करण्याची मुदत दिली होती. या तारखेपर्यंत सर्वांचे राजीनामे होतील. पक्षाच्या नेतेमंडळींनी याबाबत सर्वांना विश्वासात घेऊन बोलणी केली आहेत. - बाळासाहेब भिलारे, राष्ट्रवादी पक्षप्रतोद, जिल्हा परिषद