शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

कलम 370 हटविल्याबाबत उर्मिला म्हणाल्या, माझे सासू-सासरे तिथं राहतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 4:48 PM

मोदी सरकारने संसदेतील चर्चासत्राच अचानकपणे कलम 370 हटविल्यानंतर देशभरात एकच चर्चा सुरू झाली.

नांदेड - प्रसिद्ध अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मांतोडकर यांनी जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 बद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. कलम 370 वर प्रतिक्रिया देण्यास आता उशिर झाला आहे. ते हटवणं हे ऑफिशियल गोष्ट करणे बाकीचं होतं. कलम 370 हटविल्यामुळे काश्मीरमध्ये विकास होणार असेल, तेथील लोकांचं जीवनमान सुधारणार असेल तर उत्तमच आहे, असे उर्मिला यांनी म्हटलं आहे. मात्र, त्यासोबतच सरकारने ज्या पद्धतीने हे कलम हटवलं, त्याला विरोध दर्शवला आहे. यावेळी, काँग्रेस नेते अशोक चव्हाण हेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते.  

मोदी सरकारने संसदेतील चर्चासत्राच अचानकपणे कलम 370 हटविल्यानंतर देशभरात एकच चर्चा सुरू झाली. देशभरात अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं, तर काश्मीरमधील काही नागरिकांनी यास विरोध केला आहे. काँग्रेसनेही कलम 370 हटविण्याच्या विधेयकास आपला विरोध दर्शवला होता. हे कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी काश्मीरला भेट दिली. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव राहुल यांना श्रीनगर विमानतळावरुनच परत फिरावे लागले. त्यामुळे, अद्यापही काश्मीरमधील परिस्थिती काही प्रमाणात तणावग्रस्त असल्याचे दिसून येते. 

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी कलम 370 बाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. प्रश्न केवळ 370 हटविण्याचा नसून ते ज्या प्रकारे हटविले गेले ते महत्त्वाचं आहे. ते अमानुष पद्धतीनं करण्यात आलं आहे. माझे सासू-सासरे दोघेही काश्मीरमध्ये राहतात. दोघांनाही डायबेटीस आहे, हायब्लड प्रेशर आहे. आजचा 22 वा दिवस आहे, माझं आणि माझ्या नवऱ्याचं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. त्यांना सध्या जी औषधं लागतात, इंजक्शन हवंय, तेही त्यांच्याकडे आहे की नाही, हे आम्हाला माहित नाही. 370 नेमकं काय आहे, त्याचे परिणाम काय होतात हेही लोकांना बऱ्याचदा माहित नसतं, असे म्हणत उर्मिला यांनी कलम 370 हटविण्याच्या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Urmila Matondkarउर्मिला मातोंडकरcongressकाँग्रेस