शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

कलम 370 हटविल्याबाबत उर्मिला म्हणाल्या, माझे सासू-सासरे तिथं राहतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 16:48 IST

मोदी सरकारने संसदेतील चर्चासत्राच अचानकपणे कलम 370 हटविल्यानंतर देशभरात एकच चर्चा सुरू झाली.

नांदेड - प्रसिद्ध अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मांतोडकर यांनी जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 बद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. कलम 370 वर प्रतिक्रिया देण्यास आता उशिर झाला आहे. ते हटवणं हे ऑफिशियल गोष्ट करणे बाकीचं होतं. कलम 370 हटविल्यामुळे काश्मीरमध्ये विकास होणार असेल, तेथील लोकांचं जीवनमान सुधारणार असेल तर उत्तमच आहे, असे उर्मिला यांनी म्हटलं आहे. मात्र, त्यासोबतच सरकारने ज्या पद्धतीने हे कलम हटवलं, त्याला विरोध दर्शवला आहे. यावेळी, काँग्रेस नेते अशोक चव्हाण हेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते.  

मोदी सरकारने संसदेतील चर्चासत्राच अचानकपणे कलम 370 हटविल्यानंतर देशभरात एकच चर्चा सुरू झाली. देशभरात अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं, तर काश्मीरमधील काही नागरिकांनी यास विरोध केला आहे. काँग्रेसनेही कलम 370 हटविण्याच्या विधेयकास आपला विरोध दर्शवला होता. हे कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी काश्मीरला भेट दिली. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव राहुल यांना श्रीनगर विमानतळावरुनच परत फिरावे लागले. त्यामुळे, अद्यापही काश्मीरमधील परिस्थिती काही प्रमाणात तणावग्रस्त असल्याचे दिसून येते. 

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी कलम 370 बाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. प्रश्न केवळ 370 हटविण्याचा नसून ते ज्या प्रकारे हटविले गेले ते महत्त्वाचं आहे. ते अमानुष पद्धतीनं करण्यात आलं आहे. माझे सासू-सासरे दोघेही काश्मीरमध्ये राहतात. दोघांनाही डायबेटीस आहे, हायब्लड प्रेशर आहे. आजचा 22 वा दिवस आहे, माझं आणि माझ्या नवऱ्याचं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. त्यांना सध्या जी औषधं लागतात, इंजक्शन हवंय, तेही त्यांच्याकडे आहे की नाही, हे आम्हाला माहित नाही. 370 नेमकं काय आहे, त्याचे परिणाम काय होतात हेही लोकांना बऱ्याचदा माहित नसतं, असे म्हणत उर्मिला यांनी कलम 370 हटविण्याच्या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Urmila Matondkarउर्मिला मातोंडकरcongressकाँग्रेस