शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:28 IST

Rajnath Singh : शांघाई सहकार्य परिषदेच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार देत राजनाथ सिंह यांनी चीन आणि पाकिस्तानचा एक कुटील डाव हाणून पाडला. राजनाथ सिंह यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेची इनसाईड स्टोरी आता समोर येत आहे. 

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा शांघाई सहकार्य संघटनेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी केलेला चीन दौरा चांगलाच चर्चेत आहे. या परिषदेमध्ये राजनाथ सिंह यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानचं जागतिक मंचावर पुरतं वस्त्रहरण केलं. तसेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतानाच ऑपरेशन सिंदूरसारख्या मोहिमा भविष्यातही राबवण्याचा इशारा दिला. याचवेळी शांघाई सहकार्य परिषदेच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार देत राजनाथ सिंह यांनी चीन आणि पाकिस्तानचा एक कुटील डाव हाणून पाडला. राजनाथ सिंह यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेची इनसाईड स्टोरी आता समोर येत आहे. 

याबाबत मिळालेल्या अदिक माहितीनुसार भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्यासमोरच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद, पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरून भारताची भूमिका स्पष्ट करत पाकिस्तानची पुरती नाचक्की केली. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी या परिषदेच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. या निवेदनाच्या माध्यमातून भारताची कोंडी करण्याचा डाव चीन आणि पाकिस्तानने आखला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शांघाई सहकार्य परिषदेच्या संयुक्त निवेदनामध्ये पाकिस्तान दहशतवादाच्या संदर्भात बलुचिस्तानचाही समावेश करण्याच्या प्रयत्नात होता. त्या माध्यमातून भारताची कोंडी करण्याचा कुटील डाव होता. तसेच त्याला चीनचाही पाठिंबा होता.  बलुचिस्तानमध्ये निर्माण झालेल्या स्वातंत्र्याच्या लढाईला भारताची चिथावणी असल्याचा आरोप पाकिस्तान करून सातत्याने करण्यात येतो. त्यामुळेच बलुचिस्तानआडून भारताला बदनाम करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता.

भारताचे संरक्षणमंत्री असलेल्या राजनाथ सिंह यांना ही बाब अमान्य होती. त्यांनी या संयुक्त निवेदनाच्या मसुद्यावर सही करण्यास नकार दिला. त्याशिवाय या मसुद्यामध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करण्याची आग्रही भूमिका भारताने घेतली होती. मात्र त्याला पाकिस्तानने आक्षेप घेतला होता. त्यामुळे अखेरीस शांघाई सहकारी परिषदेच्या बैठकीनंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध होऊ शकलं नाही.  

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीन