शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:28 IST

Rajnath Singh : शांघाई सहकार्य परिषदेच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार देत राजनाथ सिंह यांनी चीन आणि पाकिस्तानचा एक कुटील डाव हाणून पाडला. राजनाथ सिंह यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेची इनसाईड स्टोरी आता समोर येत आहे. 

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा शांघाई सहकार्य संघटनेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी केलेला चीन दौरा चांगलाच चर्चेत आहे. या परिषदेमध्ये राजनाथ सिंह यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानचं जागतिक मंचावर पुरतं वस्त्रहरण केलं. तसेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतानाच ऑपरेशन सिंदूरसारख्या मोहिमा भविष्यातही राबवण्याचा इशारा दिला. याचवेळी शांघाई सहकार्य परिषदेच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार देत राजनाथ सिंह यांनी चीन आणि पाकिस्तानचा एक कुटील डाव हाणून पाडला. राजनाथ सिंह यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेची इनसाईड स्टोरी आता समोर येत आहे. 

याबाबत मिळालेल्या अदिक माहितीनुसार भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्यासमोरच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद, पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरून भारताची भूमिका स्पष्ट करत पाकिस्तानची पुरती नाचक्की केली. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी या परिषदेच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. या निवेदनाच्या माध्यमातून भारताची कोंडी करण्याचा डाव चीन आणि पाकिस्तानने आखला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शांघाई सहकार्य परिषदेच्या संयुक्त निवेदनामध्ये पाकिस्तान दहशतवादाच्या संदर्भात बलुचिस्तानचाही समावेश करण्याच्या प्रयत्नात होता. त्या माध्यमातून भारताची कोंडी करण्याचा कुटील डाव होता. तसेच त्याला चीनचाही पाठिंबा होता.  बलुचिस्तानमध्ये निर्माण झालेल्या स्वातंत्र्याच्या लढाईला भारताची चिथावणी असल्याचा आरोप पाकिस्तान करून सातत्याने करण्यात येतो. त्यामुळेच बलुचिस्तानआडून भारताला बदनाम करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता.

भारताचे संरक्षणमंत्री असलेल्या राजनाथ सिंह यांना ही बाब अमान्य होती. त्यांनी या संयुक्त निवेदनाच्या मसुद्यावर सही करण्यास नकार दिला. त्याशिवाय या मसुद्यामध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करण्याची आग्रही भूमिका भारताने घेतली होती. मात्र त्याला पाकिस्तानने आक्षेप घेतला होता. त्यामुळे अखेरीस शांघाई सहकारी परिषदेच्या बैठकीनंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध होऊ शकलं नाही.  

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीन