शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

भारतासाठी लाल समुद्र विश्वासार्ह मार्ग, अमेरिकेच्या एका निर्णयामुळे तणाव, जगासाठी इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 17:30 IST

लाल समुद्रात तणावाची (रेड सी वॉर) परिस्थिती निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली: ऑक्टोबरमध्ये इस्रायल-हमास युद्धानंतर लाल समुद्रात मालवाहतूक करणाऱ्या जहाजांवरही हल्ले सुरू झाले. हमासला पाठिंबा देण्यासाठी, हूती बंडखोरांनी इजिप्तच्या सुएझद्वारे येमेनमधून जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य केले आहे. आता याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने ब्रिटनसह गेल्या दोन दिवसांत येमेनमधील हूती बंडखोरांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आहेत, त्यानंतर हूतींनी पुन्हा हल्ला करण्याची धमकी दिली आहे.

या घटनेमुळे लाल समुद्रात तणावाची (रेड सी वॉर) परिस्थिती निर्माण झाली आहे. हल्ल्याची वाढती भीती लक्षात घेऊन कंपन्या निर्यात शिपमेंट थांबवत आहेत. अमेरिकेनेही जहाजांना लाल समुद्रापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. या हल्ल्याचा भारतावर थेट परिणाम झालेला नाही. परंतु जागतिक समस्या पाहता भारताच्या निर्यात आणि आयात व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

जगभर महागाई वाढेल

भारतासह अनेक देश या मार्गावरून कच्च्या तेलापासून ते कपडे, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, खाद्यपदार्थ आणि इतर सर्व गोष्टींची आयात आणि निर्यात करतात. नवीन मार्गाने निर्यात करावी लागली किंवा शिपमेंट थांबवली, तर भारतासह संपूर्ण जगात जागतिक महागाई आणखी वाढेल. 

भारताच्या निर्यातीत ३० अब्ज डॉलर्सची घट होण्याची शक्यता

नवी दिल्लीच्या थिंक टँक रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर डेव्हलपिंग कंट्रीजने एक मूल्यांकन सादर केले आहे. अहवालात म्हटले आहे की, लाल समुद्र हा भारतासाठी सर्वात विश्वासार्ह मार्ग आहे आणि येथून निर्यात-आयातीचा खर्च इतर मार्गांपेक्षा स्वस्त आहे. अशा स्थितीत लाल समुद्रातील (रेड सी वॉर) तणावामुळे तिथून जाणाऱ्या जहाजांमध्ये ४४ टक्के कपात होऊ शकते. भारताच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या ४५१ अब्ज डॉलरच्या तुलनेत यावर्षी ६ ते ७ टक्क्यांनी घट होऊ शकते. याचा अर्थ भारताची निर्यात ३० अब्ज डॉलरने कमी होऊ शकते.

हूती बंडखोर कोण आहेत?

१९८०च्या दशकात येमेनमध्ये हुतींचा उदय झाला. शिया मुस्लिमांची ही सर्वात मोठी आदिवासी संघटना आहे. अब्दुल्ला सालेहच्या आर्थिक धोरणांमुळे हूतींना राग आला, ज्यामुळे येमेनच्या उत्तरेकडील प्रदेशात अराजगता वाढली आणि सन २०००मध्ये हूतींनी सैन्य तयार केले. अब्दुल्ला सालेहच्या सैन्याने २००४ ते २०१० दरम्यान हूतींसोबत ६ युद्धे लढली. २०११मध्ये अरबांच्या हस्तक्षेपामुळे हे युद्ध थांबले आणि सुमारे दोन वर्षे चर्चा सुरू राहिली. पण तोडगा निघाला नाही. यानंतर, हूतींनी सौदी अरेबिया समर्थित नेते अहमद रब्बो मन्सूर हादी यांना सत्तेवरून हटवले आणि येमेनची राजधानी सना ताब्यात घेतली. हूतीकडे असलेले सैनिक टँक, अँटी-टँक क्षेपणास्त्रे, लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि अगदी तांत्रिक वाहने चालविण्यास सक्षम आहेत. 

टॅग्स :IndiaभारतIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धbusinessव्यवसायAmericaअमेरिका