शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भारतासाठी लाल समुद्र विश्वासार्ह मार्ग, अमेरिकेच्या एका निर्णयामुळे तणाव, जगासाठी इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 17:30 IST

लाल समुद्रात तणावाची (रेड सी वॉर) परिस्थिती निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली: ऑक्टोबरमध्ये इस्रायल-हमास युद्धानंतर लाल समुद्रात मालवाहतूक करणाऱ्या जहाजांवरही हल्ले सुरू झाले. हमासला पाठिंबा देण्यासाठी, हूती बंडखोरांनी इजिप्तच्या सुएझद्वारे येमेनमधून जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य केले आहे. आता याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने ब्रिटनसह गेल्या दोन दिवसांत येमेनमधील हूती बंडखोरांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आहेत, त्यानंतर हूतींनी पुन्हा हल्ला करण्याची धमकी दिली आहे.

या घटनेमुळे लाल समुद्रात तणावाची (रेड सी वॉर) परिस्थिती निर्माण झाली आहे. हल्ल्याची वाढती भीती लक्षात घेऊन कंपन्या निर्यात शिपमेंट थांबवत आहेत. अमेरिकेनेही जहाजांना लाल समुद्रापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. या हल्ल्याचा भारतावर थेट परिणाम झालेला नाही. परंतु जागतिक समस्या पाहता भारताच्या निर्यात आणि आयात व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

जगभर महागाई वाढेल

भारतासह अनेक देश या मार्गावरून कच्च्या तेलापासून ते कपडे, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, खाद्यपदार्थ आणि इतर सर्व गोष्टींची आयात आणि निर्यात करतात. नवीन मार्गाने निर्यात करावी लागली किंवा शिपमेंट थांबवली, तर भारतासह संपूर्ण जगात जागतिक महागाई आणखी वाढेल. 

भारताच्या निर्यातीत ३० अब्ज डॉलर्सची घट होण्याची शक्यता

नवी दिल्लीच्या थिंक टँक रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर डेव्हलपिंग कंट्रीजने एक मूल्यांकन सादर केले आहे. अहवालात म्हटले आहे की, लाल समुद्र हा भारतासाठी सर्वात विश्वासार्ह मार्ग आहे आणि येथून निर्यात-आयातीचा खर्च इतर मार्गांपेक्षा स्वस्त आहे. अशा स्थितीत लाल समुद्रातील (रेड सी वॉर) तणावामुळे तिथून जाणाऱ्या जहाजांमध्ये ४४ टक्के कपात होऊ शकते. भारताच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या ४५१ अब्ज डॉलरच्या तुलनेत यावर्षी ६ ते ७ टक्क्यांनी घट होऊ शकते. याचा अर्थ भारताची निर्यात ३० अब्ज डॉलरने कमी होऊ शकते.

हूती बंडखोर कोण आहेत?

१९८०च्या दशकात येमेनमध्ये हुतींचा उदय झाला. शिया मुस्लिमांची ही सर्वात मोठी आदिवासी संघटना आहे. अब्दुल्ला सालेहच्या आर्थिक धोरणांमुळे हूतींना राग आला, ज्यामुळे येमेनच्या उत्तरेकडील प्रदेशात अराजगता वाढली आणि सन २०००मध्ये हूतींनी सैन्य तयार केले. अब्दुल्ला सालेहच्या सैन्याने २००४ ते २०१० दरम्यान हूतींसोबत ६ युद्धे लढली. २०११मध्ये अरबांच्या हस्तक्षेपामुळे हे युद्ध थांबले आणि सुमारे दोन वर्षे चर्चा सुरू राहिली. पण तोडगा निघाला नाही. यानंतर, हूतींनी सौदी अरेबिया समर्थित नेते अहमद रब्बो मन्सूर हादी यांना सत्तेवरून हटवले आणि येमेनची राजधानी सना ताब्यात घेतली. हूतीकडे असलेले सैनिक टँक, अँटी-टँक क्षेपणास्त्रे, लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि अगदी तांत्रिक वाहने चालविण्यास सक्षम आहेत. 

टॅग्स :IndiaभारतIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धbusinessव्यवसायAmericaअमेरिका