शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

सुरक्षा आणि देखरेखीसाठी रेल्वे करणार दोन लाख कर्मचाऱ्यांची भरती, सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 11:27 IST

गेल्या काही काळात एकापाठोपाठ एक झालेल्या रेल्वे अपघातांमुळे सुरक्षा आणि देखरेखीसाठी रेल्वेने मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे सुरक्षा तंत्र आणि मार्गावरील गस्त सुधारण्यासाठी पुढील काही वर्षांत सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे.

नवी दिल्ली, दि. 23 - गेल्या काही काळात एकापाठोपाठ एक झालेल्या रेल्वे अपघातांमुळे सुरक्षा आणि देखरेखीसाठी रेल्वेने मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे सुरक्षा तंत्र आणि मार्गावरील गस्त सुधारण्यासाठी पुढील काही वर्षांत सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. सध्या रेल्वेमध्ये सुरक्षा तंत्राशी संबंधित सुमारे 16 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे देशातील 64 हजार किमी लांबीच्या रेल्वे मार्गाची देखरेख आणि दुरुस्ती करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. भारतीय रेल्वे ही रोजगार देणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या संस्थांमध्ये सामील असून, भारतीय रेल्वेकडे सद्यस्थितीत 13 लाख कर्मचारी आहेत.   नुकत्याच उत्तर प्रदेशमध्ये उत्कल एक्स्प्रेस रुळावरून घसरून झालेल्या अपघातानंतर रेल्वेच्या देखरेखीवर प्रश्न उपस्थित झाले होते. या अपघातात जवळपास 21 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच गेल्या तीन वर्षांत झालेल्या रेल्वे अपघातांमध्ये सुमारे 650 हून अधिक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान, आम्ही आपल्या नेटवर्कमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक  करणार आहोत. ही रक्कम रेव्वेच्या आधुनिकीकरणावर खर्च करण्यात येणाऱ्या रक्कमेपेक्षा वेगळी असेल, असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.  मॉडर्नाइजेशन पर खर्च की जाने वाली रकम से अलग होगी। यह पैसा ट्रैक के रिन्यूअल पर खर्च किया जाएगा।'  गेल्या तीन वर्षांमध्ये रेल्वेचे सरासरी 115 अपघात झाले आहेत. त्यामुळे पुढील काही काळात रेल्वेमध्ये होणाऱ्या कर्मचारी भरतीमध्ये सर्वाधिक कर्मचारी हे सुरक्षा आणि देखरेख विभागातील असतील. तसेच गँगमन, ट्रॅकमन यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांनुसार प्रशिक्षित करण्यात येणार आहे. तसेच ट्रॅकवर नजर ठेवण्यासाठी 100 हून अधिक इंन्स्पेक्शन व्हेईकल्स खरेदी करण्याचाही रेव्वेचा विचार आहे. त्याबरोबरच रेल्वेच्या रुळांमधील तड्यांची संभाव्य माहिती देणाऱ्या सेंसर टेक्नॉलॉजीचे पायलट रनसुद्धा होईल.  अधिक वाचाउन्माद करणाऱ्यांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपाला अप्रत्यक्ष टोलाहातावरील टॅटूमुळे पकडले गेले चोर; सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांनी लावला छडाअलिबाबा डाटा चोर ! UC ब्राऊजर वापरत असाल तर सावधान, तुमचा डाटा थेट चीनच्या सर्व्हरमध्ये होतोय जमादरम्यान, आज पुन्हा एकदा रेल्वेला अपघात झाला असून, उत्तर प्रदेशमध्ये कैफियत एक्स्प्रेस रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 74 प्रवासी जखमी झाले आहेत.  उत्तर प्रदेशातील कानपूर आणि इटावा दरम्यान औरैया जिल्ह्यात 12225 (अप) कैफियत एक्स्प्रेसचा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. येथील अछल्दा आणि पाता रेल्वे स्टेशनच्या दरम्यान मानवरहीत क्रॉसिंगजवळ रेल्वे फाटक आहे. या ठिकाणी फाटक क्रॉस करणा-या डंपरला कैफियत एक्स्प्रेसने धडक दिली. यावेळी कैफियत एक्स्प्रेसचे इंजिनसह दहा डबे रुळावरुन खाली घसरले. ही घटना रात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, या अपघातात त्यात ७४ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना औरैया येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारत