शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

महाराष्ट्रातील 38 हजार वाहनांची ‘जीपीएसवर’ टाेलवसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 07:06 IST

चाचणीचा दुसरा टप्पा, देशभरात १ लाखाहून अधिक वाहनांचा समावेश

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : टाेलवसुलीसाठी काही वर्षांपूर्वी फास्टॅग यंत्रणेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आता त्यात लवकरच बदल हाेणार आहे. जीपीएसवर आधारित टाेलवसुली करण्यात येणार असून, त्याची चाचणी पुढील टप्प्यात सुरू करण्यात आली आहे. यात देशभरातील १.३७ लाख वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक ३८ हजार वाहने महाराष्ट्रातील आहेत.

केंद्र सरकारने दाेन वर्षांपूर्वी टाेलवसुलीसाठी सर्व चारचाकी व त्यापेक्षा माेठ्या वाहनांना फास्टॅग बंधनकारक केला. त्यानंतर आता जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून टाेलवसुलीच्या नव्या पद्धतीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत काही महिन्यांपूर्वीच माहिती दिली हाेती. आता या यंत्रणेची चाचणी सुरू करण्यात आली आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात मुंबई-दिल्ली काॅरिडाॅरमध्ये काही ट्रॅकमध्ये याची चाचणी करण्यात आली हाेती. ट्रॅकमध्ये एक ऑनबाेर्ड युनिट बसविण्यात आले हाेते. त्याचा मार्ग ट्रॅक करण्यासाठी इस्राेच्या नेव्हिगेशन उपग्रहाच्या मदतीचा वापर करण्यात आला हाेता. हा प्रयाेग यशस्वी झाल्यानंतर आता त्याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. रशिया आणि दक्षिण कोरियाच्या तज्ज्ञांकडून एक अहवाल तयार करण्यात येत आहे. यातील मुद्द्यांच्या आधारे परिवहन धोरणात बदल करण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जीपीएस ट्रॅकिंगने ठरणार टाेलची रक्कमटाेलमार्गावर गाडी किती किलाेमीटर धावते, त्यानुसार टाेल आकारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणेचा वापर हाेणार आहे. वाहनमालकाच्या खात्यातून तेवढा टाेल कापण्यात येईल. ही पद्धत फास्टॅगसारखीच असेल. जर्मनी आणि रशियामध्ये या पद्धतीचा माेठ्या प्रमाणावर वापर हाेत आहे. ही यंत्रणा लागू केल्यानंतर देशातील सर्व टाेल नाके हटविण्यात येतील.

या राज्यांमध्ये दुसरा टप्पादुसऱ्या टप्प्यात देशभरातील १.३७ लाख वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रात ३८,६८०, दिल्लीत २९,७०५, उत्तराखंडमध्ये १४,४०१, छत्तीसगडमध्ये १३,५९२, हिमाचलप्रदेशात १०,८२४ आणि गाेव्यात ९,११२ वाहनांचा समावेश आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीgoogleगुगल