शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

रेकॉर्डब्रेक! यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बत 67.1 टक्के मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 16:57 IST

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्येही मतदारांचा भरपूर उत्साह दिसून आला असून, सात टप्प्यात झालेल्या मतदानामध्ये विक्रमी मतदान झाले आहे.

नवी दिल्ली - सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आटोपून आता निकालाची वेळ आली आहे. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्येही मतदारांचा भरपूर उत्साह दिसून आला असून, सात टप्प्यात झालेल्या मतदानामध्ये तब्बल 67.1 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. गेल्यावेळच्या मतदानापेक्षा मतदानाचा टक्का यावेळी वाढला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 543 जागांसाठी 66.44 टक्के मतदान झाले होते. त्यापेक्षा यावेळी अधिक मतदान झाले आहे. गेल्या 16 लोकसभा निवडणुकांचा आढावा घेतल्यास मतदानाच्या टक्केवारीमध्ये सातत्याने चढउतार होत असल्याचे दिसून येते. 1951-52 मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सर्वात कमी होती. त्यावेळी केवळ 45.67 टक्के मतदान झाले होते. नंतरच्या काळाता थोड्या बहुत प्रमाणात का होईना मतदानाची टक्केवारी वाढत गेली. 1957 मध्ये 47.74 टक्के, 1962 मध्ये 55.42 टक्के, 1967 मध्ये 61.33 टक्के, 1971 मध्ये 55.88 टक्के, 1977 मध्ये 60.49 टक्के,  1980 मध्ये 56.92 टक्के,  1984-85 मध्ये 64.01 टक्के, 1989 मध्ये 61.95 टक्के, 1991-92 मध्ये 55.88 मध्ये,  1996 मध्ये 57.94 टक्के,  1998 मध्ये 61.97 टक्के, 1999 मध्ये 59.99 टक्के, 2004 मध्ये 57.19 टक्के, 2009 मध्ये 58.19 टक्के आणि 2014 मध्ये 66.44 टक्के मतदान झाले होते.  

आता नुकत्याचा आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाने प्रथमच 67 टक्क्यांचा आकडा पार केला आहे. यावेळी 67.1 टक्के मतदान झाले आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगIndiaभारत