शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 07:05 IST

विदर्भ चाळिशीपार; नागपुरात उष्माघाताने ६ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत बुधवारी दुपारी आजवरचे ऐतिहासिक ५२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे पुढे आले,  परंतु दिल्लीत एवढे तापमान अशक्य आहे. सेन्सरमधील त्रुटींमुळे विक्रमी तापमानाची नोंद झाली. दिल्लीतील सरासरी तापमान हे ४६.८ अंश सेल्सिअस इतकेच होते, असे स्पष्टीकरण भारतीय हवामान विभागाच्या वतीने देण्यात आले.

काही दिवसांपासून दिल्लीसह उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट आली आहे. मंगळवारी दिल्लीच्या मुंगेशपूरमध्ये ४९.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले. त्यानंतर अवघ्या २४ तासांत मुंगेशपूरमध्ये बुधवारी दुपारी अडीच वाजता ५२.९ अंश तापमानाची झाली. दिल्लीच्या पाऱ्याने राजस्थानलाही मागे टाकल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त झाले. परंतु काही वेळाने हवामान विभागानेही शंका उपस्थित केली. 

देशात हरयाणाच्या रोहतकमध्ये बुधवारी सर्वाधिक ४८.८ अंश तापमान असल्याचे हवामान विभागाच्यावतीने रात्री उशिरा स्पष्ट करण्यात आले. ताेपर्यंत दिल्लीच्या विक्रमी तापमानाचीच देशभरात गरमागरम चर्चा रंगली हाेती.

३ तासांची पगारी रजा

दिल्लीतील तापमानवाढीची दखल घेत उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी भर उन्हात काम करणाऱ्या कामगारांना दुपारी १२ वाजेपासून ३ वाजेपर्यंत तीन तासांच्या पगारी रजेची घोषणा केली आहे. तसेच कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.

विदर्भ चाळिशीपार; नागपुरात उष्माघाताने ६ मृत्यू

  • नवतपामुळे विदर्भात बुधवारीदेखील सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा चाळिशीच्या पुढे राहिला. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत सर्वाधिक ४६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 
  • विदर्भात सूर्याचा प्रकोप पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 
  • वाढत्या तापमानामुळे बुधवारी नागपुरात सहा जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. आर्द्रता काही प्रमाणात घटल्याने दमट वातावरणाची जाणीव कमी झाली; पण उन्हाच्या झळा मात्र त्रासदायक ठरल्या आहेत. 
  • दिवसासाेबत रात्रीही उष्ण लहरींचा प्रभाव वाढल्याचे जाणवत आहे.

टॅग्स :delhiदिल्लीSummer Specialसमर स्पेशलHeat Strokeउष्माघातVidarbhaविदर्भ