शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

ओळखपत्र दाखवल्यानंतरच होणार प्रीपेड सिम कार्ड रिचार्ज

By admin | Updated: February 7, 2017 12:14 IST

पुढील एक वर्षात सर्व प्रीपेड सिम कार्ड धारकांना ओळखपत्र दाखवल्यानंतरच सिम रिचार्ज करण्याची परवानगी दिली जाईल

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - मोदी सरकार सध्या अशा एका योजनेवर काम करत आहे, ज्यानुसार पुढील एक वर्षात सर्व प्रीपेड सिम कार्ड धारकांना ओळखपत्र दाखवल्यानंतरच सिम रिचार्ज करण्याची परवानगी दिली जाईल. केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. सरकार आधारशी संबंधित केवायसीसारख्या योजनांना घेऊन घाई केली जाऊ शकत नाही, कारण यासाठी आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणणंदेखील महत्वाचं आहे. सध्या मोबाईलच्या माध्यमातून होणा-या आर्थिक व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे असं अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी न्यायालयात सांगितलं आहे. 
 
सरकार आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत न्यायालयाने धारेवर घेतलं, मात्र अॅटर्नी जनरल यांनी विरोध केला. 'आधार सध्या ऐच्छिक आहे, मात्र त्याला अनिवार्य करण्यासाठी न्यायालयात सादर केलं जाईल. या योजनेत सध्या अनिवार्य असण्याचा मुद्दा नसल्याचं', रोहतगी बोलले आहेत. 'भारतात आतापर्यंत 110 कोटी लोकांनी आधार कार्ड बनवलं आहे. 75 वर्षाहून अधिक वय असलेल्या अनेक वृद्धांनी आतापर्यंत आधार कार्ड बनवलेलं नाही', असा दावा रोहतगी यांनी केला आहे. 
 
रोहतगी यांनी सांगितलं की, 'इतर ओळखपत्रांची नकल केली जाऊ शकते. मात्र आधारमधील बायोमेट्रिक्सची कॉपी केली जाऊ शकत नाही'. 'सरकार सर्व मोबाईल फोन ग्राहकांसाठी आधारशी संबंधित केवायसीच्या तयारीत आहे. यासाठी वेळ लागेल आणि हे एका रात्रीत होऊ शकत नाही', असं रोहतगी बोलले आहेत.